शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

नागपुरात एकही पीडित महिला नाही!

By admin | Updated: June 11, 2014 01:14 IST

राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही.

माहितीच्या अधिकारात उघड : मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी व्हावीनागपूर : राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही. अत्याचार पीडित महिलांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द मिळावी म्हणून राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली. पण अनेक शहरात या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यात नागपुरात तर या योजनेंतर्गत एकही पीडित महिला नाही. ही योजना बलात्कार पीडित, अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांचे लैंगिक शोषण झाल्यास त्यांना नव्याने समाजात उभे करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण होणाऱ्या बालक व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, त्यांना आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञांची सेवा मनोधैर्य योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात येतात. या योजनेत बलात्कार पीडितांना किमान दोन लाख व कमाल तीन लाख अर्थसाहाय्य करण्यात येते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना राबविण्यात येते. विभागाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारच्या घटनांत संबंधित पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागून घ्यावी आणि स्वत:हून दखल घ्यावी, असा नियम आहे. त्यानंतर या प्रकरणात महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्याने पीडितांना अर्थसाहाय्य मिळवून देण्याची योजना आहे. यात नागपुरात एकही महिला पीडित नसल्याची माहिती विभागातर्फे माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांना देण्यात आली आहे, हे विशेष! आतापर्यंत राज्यात २४ मुले, ६६ पीडित महिलांना भरपाईदाखल रक्कम देण्यात आली तर अद्याप १०० पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्यात आले नाही. पण हे बहुतेक आकडे पश्चिम महाराष्ट्रातील आहे. अकोल्यातील पाच प्रकरणांपैकी २, गोंदियातील ६ प्रकरणापैकी तीन, भंडाऱ्यातील दहा प्रकरणांपैकी दोन मुले यांना मदत करण्यात आली आहे. सांगलीतील २५ प्रकरणांपैकी १३ प्रकरणे निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती आहे. मुळात या योजनेत काही पीडितांना अर्थसाहाय्य मिळाले, ही समाधानाची बाब असली तरी ज्या कारणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्याला अद्याप यश आलेले नाही. ही गंभीर प्रकरणे तितक्याच गंभीरपणे शासकीय आणि सामाजिक स्तरावर घेण्याची गरज असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)