शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

नागपुरात एकही पीडित महिला नाही!

By admin | Updated: June 11, 2014 01:14 IST

राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही.

माहितीच्या अधिकारात उघड : मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी व्हावीनागपूर : राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही. अत्याचार पीडित महिलांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द मिळावी म्हणून राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली. पण अनेक शहरात या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यात नागपुरात तर या योजनेंतर्गत एकही पीडित महिला नाही. ही योजना बलात्कार पीडित, अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांचे लैंगिक शोषण झाल्यास त्यांना नव्याने समाजात उभे करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण होणाऱ्या बालक व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, त्यांना आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञांची सेवा मनोधैर्य योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात येतात. या योजनेत बलात्कार पीडितांना किमान दोन लाख व कमाल तीन लाख अर्थसाहाय्य करण्यात येते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना राबविण्यात येते. विभागाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारच्या घटनांत संबंधित पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागून घ्यावी आणि स्वत:हून दखल घ्यावी, असा नियम आहे. त्यानंतर या प्रकरणात महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्याने पीडितांना अर्थसाहाय्य मिळवून देण्याची योजना आहे. यात नागपुरात एकही महिला पीडित नसल्याची माहिती विभागातर्फे माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांना देण्यात आली आहे, हे विशेष! आतापर्यंत राज्यात २४ मुले, ६६ पीडित महिलांना भरपाईदाखल रक्कम देण्यात आली तर अद्याप १०० पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्यात आले नाही. पण हे बहुतेक आकडे पश्चिम महाराष्ट्रातील आहे. अकोल्यातील पाच प्रकरणांपैकी २, गोंदियातील ६ प्रकरणापैकी तीन, भंडाऱ्यातील दहा प्रकरणांपैकी दोन मुले यांना मदत करण्यात आली आहे. सांगलीतील २५ प्रकरणांपैकी १३ प्रकरणे निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती आहे. मुळात या योजनेत काही पीडितांना अर्थसाहाय्य मिळाले, ही समाधानाची बाब असली तरी ज्या कारणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्याला अद्याप यश आलेले नाही. ही गंभीर प्रकरणे तितक्याच गंभीरपणे शासकीय आणि सामाजिक स्तरावर घेण्याची गरज असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)