शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नागपूर संघभूमी नव्हे, दीक्षाभूमीच

By admin | Updated: April 15, 2016 02:13 IST

‘नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात ती डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे,

नागपूर : ‘नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात ती डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे, तर डॉ. आंबेडकरांचे आहे,’ असे प्रतिपादन कन्हैया कुमार याने गुरुवारी केले. धनवटे नॅशनल कॉलेज येथे झालेल्या जाहीर सभेत त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘देशात विशिष्ट विचारसरणीला लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही अन् संघ म्हणजे संसद नाही. संघाचा गणवेश बदलला असला, तरी दृष्टिकोन बदललेला नाही,’ असे तो म्हणाला. ‘मी नागपुरात कुठलाही संदेश द्यायला आलो नाही, तर डॉ.आंबेडकरांचा संदेश घेण्यासाठी आलो आहे. या मातीत त्यांचे संस्कार आहेत.’ ‘नागपुरात केवळ ‘हाफपँट’वाले लोक राहात नाहीत, तर पूर्ण डोके असलेल्यादेखील अनेक व्यक्ती आहेत. मी प्रत्येक वर्षी १४ एप्रिलरोजी नागपुरात येईन,’ असे तो म्हणाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केंद्र शासनाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, परंतु केवळ मतांसाठी हे करण्यात येत असल्याचा आरोपही त्याने केला.‘जेएनयू’तील प्रकरणासंदर्भात जे आरोप करण्यात येत आहेत, तेएका षड्यंत्राचा भाग आहेत.मुळात मी किंवा तेथील कुणीही विद्यार्थी देशविरोधी नाहीत. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळावे याची तरतूद केली पाहिजे, परंतु हे तरशिक्षणात ब्राह्मणवाद आणत आहेत, अशा शब्दांत त्याने केंद्राच्या धोरणांवर टीका केली.राजकारणापासून कुणीच दूर नाही‘कन्हैया कुमारने राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. भारतातील प्रत्येक व्यक्ती जन्मापासूनच राजकारणाशी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जुळलेलीअसते. मी कुठल्याही संधीच्या प्रतीक्षेत नाही, परंतु राजकारणापासून कुणीही दूर नाही,’ असे तो पत्रकार परिषदेत म्हणाला. (प्रतिनिधी)कन्हैयावर चप्पलफेक, बजरंग दलाचा गोंधळकन्हैया कुमार सकाळी नागपूर विमानतळावर दाखल झाला. तिथून गाडीने निघाल्यावर काही अंतरावरच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत दगडफेक केली. प्रत्यक्ष सभा सुरू असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’चे नारे देत गोंधळ घालायला सुरुवात केली. कन्हैयासमर्थक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला व सभागृहातच हाणामारी सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच मंचावर उभ्या असलेल्या एकाने कन्हैयावर चप्पल फेकली. उपस्थित कार्यकर्त्यांकडून त्याला मारहाण होत असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.सरसंघचालकांच्या मुद्द्यावर निरुत्तर महिलांनी घराबाहेर निघू नये, असे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वक्तव्य केल्याचे सांगत कन्हैयाने सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली, परंतु त्यांनी संबंधित वक्तव्य कधी व कुठे केले, याबाबत कन्हैयाला पत्रपरिषदेदरम्यान विचारणा करण्यात आली असता, त्याने यावर मौन साधले. या मुद्द्यावर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर पत्रपरिषद संपल्याचीच घोषणा करण्यात आली.दीक्षाभूमीला भेट : दीक्षाभूमीवर कन्हैयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली. या वेळी त्याला पाहण्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. बाहेर आल्यानंतर त्याने ‘जय भीम’च्या, तसेच ‘बाबा तेरा मिशन अधुरा, हम सब मिलकर करेंगे पुरा...’ ‘संघवाद से आझादी...’ अशा घोषणा दिल्या.