शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘सैराट’च्या शेवटाची चर्चा नागराजनेही केली नाही - पवार

By admin | Updated: July 22, 2016 03:23 IST

सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही.

मुंबई : सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे हेदेखील ‘सैराट’च्या शेवटाची चर्चा करताना दिसत नाहीत, अशी खंत साहित्यिक व नाटककार संजय पवार यांनी व्यक्त केली.दादर येथे विजय सातपुते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेतर्फे ‘सैराट : सिनेमाच्या पलीकडे’ या विषयावर बुधवारी सायंकाळी आयोजित परिसंवादात संजय पवार बोलत होते. या वेळी स्त्री चळवळीच्या अभ्यासक प्रतिमा परदेशी, आंबेडकरवादी कार्यकर्ते सुरेश सावंत आणि स्त्रीमुक्तीवादी जेष्ठ कार्यकर्त्या लता प्र. म. उपस्थित होत्या.प्रतिमा परदेशी यांनी सैराटमधील अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, स्त्रियांना प्रेम व्यक्त करण्यासाठी जागा नाही. मात्र सैराटमुळे मुली प्रेम व्यक्त करू लागल्या आहेत. तसेच आंबेडकरी चळवळीतील लोकांनी सैराटचा शेवट गांभीर्याने घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. सुरेश सावंत म्हणाले, सैराट हा सिनेमा दलित व बहुजनांचा आहे. मात्र तो ‘फँड्री’एवढा सरस नाही. आज अनेक चळवळीतले कार्यकर्ते विवाह करताना जात पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर लता प्र. म. यांनी सैराटची दृष्टी स्त्रीवादी असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)>मनीषा चौधरी यांची मागणी हास्यास्पदभाजपाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी ‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे बलात्काराच्या घटना वाढल्या असून, यातील आक्षेपार्ह भागांवर बंदी घालायला हवी, असे विधान केले होते. मात्र मनीषा चौधरी यांचे हे विधान हास्यास्पद आहे, असेही संजय पवार यांनी चर्चासत्रात नमूद केले.