शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नगर-बीड-परळी ६ वर्षांत पूर्ण करणार

By admin | Updated: May 28, 2015 01:23 IST

अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले.

मुंबई : अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले.वेगवेगळ्या राज्यांतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधतात. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाबाबत राज्य सरकारची भूमिका जाणून घेण्याकरिता मोदी यांनी क्षत्रिय यांच्याशी संपर्क केला. १९९५ साली जेव्हा या मार्गाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला गेला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ५१४ कोटी रुपये होता. निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प रखडला व खर्च वाढला. २००९ मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली. आजमितीस या प्रकल्पाचा खर्च २८८० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे ़ ही बाब रेल्वे मंत्रालयाने बुधवारी सकाळीच राज्य सरकारला कळवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले.क्षत्रिय यांनी पंतप्रधानांना आश्वस्त केले की, राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या रेल्वे प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलण्याचा निर्णय मंजूर केला जाईल. या प्रकल्पाकरिता १६०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने १३०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित ३०० हेक्टर जमिनीचे संपादन डिसेंबर २०१५ पर्यंत केले जाईल, असेही क्षत्रिय यांनी पंतप्रधानांकडे स्पष्ट केले. अहमदनगर-बीड या १६० कि.मी. रेल्वेमार्गाचे काम २०१९ पर्यंत व बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम त्यापुढील दोन वर्षांत केले जाईल, असे क्षत्रिय यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)