शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

नगर-बीड-परळी ६ वर्षांत पूर्ण करणार

By admin | Updated: May 28, 2015 01:23 IST

अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले.

मुंबई : अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले.वेगवेगळ्या राज्यांतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधतात. अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाबाबत राज्य सरकारची भूमिका जाणून घेण्याकरिता मोदी यांनी क्षत्रिय यांच्याशी संपर्क केला. १९९५ साली जेव्हा या मार्गाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला गेला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ५१४ कोटी रुपये होता. निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प रखडला व खर्च वाढला. २००९ मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली. आजमितीस या प्रकल्पाचा खर्च २८८० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे ़ ही बाब रेल्वे मंत्रालयाने बुधवारी सकाळीच राज्य सरकारला कळवली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले.क्षत्रिय यांनी पंतप्रधानांना आश्वस्त केले की, राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या रेल्वे प्रकल्पाचा ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलण्याचा निर्णय मंजूर केला जाईल. या प्रकल्पाकरिता १६०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने १३०० हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित ३०० हेक्टर जमिनीचे संपादन डिसेंबर २०१५ पर्यंत केले जाईल, असेही क्षत्रिय यांनी पंतप्रधानांकडे स्पष्ट केले. अहमदनगर-बीड या १६० कि.मी. रेल्वेमार्गाचे काम २०१९ पर्यंत व बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम त्यापुढील दोन वर्षांत केले जाईल, असे क्षत्रिय यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)