शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

By admin | Updated: March 14, 2016 02:37 IST

केवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले

गणेश धुरी,  नाशिककेवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले अन् बघता बघता पाटचारी पूर्ण होऊन कोरड्याठाक नदीत पाणी अवतरले. बागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरेसह परिसरामधील गावांतील ग्रामस्थांनी एका दिवसात ५०० मीटर पाटचारी खोदली. त्यामुळे १० गावांचा पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला.कपालेश्वर गावाजवळील हत्ती नदीला गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणीच नसल्याने पात्र कोरडे पडले होते. पठावे लघुसिंचन प्रकल्पातून हत्ती नदीला पाणी येते. तो प्रकल्पच कोेरडाठाक असल्याने नदीला पाणीच नव्हते. कपालेश्वर, किकवारी, विंचुरे व जोरणच्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्याकडे आरम व हत्ती नदी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र आरम नदीतील पाणी थेट हत्ती नदीत आणण्यासाठी अनेक परवानग्या लागणार हे गृहीतधरून पाटील यांनी पाटचारी खोदण्यासाठी लोकसहभागाची संकल्पना मांडली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.दुसऱ्याच दिवशी जेसीबी, इतर यंत्रसामग्रीसह दोनशे ग्रामस्थांनी हाती टिकाव-फावडे घेत पाटचारी खोदकामास सुरुवात केली आणि एका दिवसात काम पूर्ण केले. पाटचारीत सुमारे २४ पाइप टाकण्यात आले. गावकऱ्यांनी पदरमोड करून हा नद्याजोड प्रकल्प साकारला. अनिल पाटील यांनी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून केळझर धरणातून ५५ दलघफू पाणी हत्ती नदीत सोडण्यासाठी हिरवा कंदील मिळविला. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान हत्ती नदी खळाळून वाहिली. शासकीय निधीची वाट पाहत न बसता वीरगाव गटात लोकसहभागातून जवळपास १२ ते १३ प्रकारची विविध कामे करण्यात आली आहेत. त्यात आरम-हत्ती नद्या जोडण्यासाठी पाटचारी खोदण्यासह नालाबांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण कामे केली. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याबरोबरच भूजलपातळीत वाढ झाली आहे.- प्रा. अनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्य, बागलाण