शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

By admin | Updated: March 14, 2016 02:37 IST

केवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले

गणेश धुरी,  नाशिककेवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले अन् बघता बघता पाटचारी पूर्ण होऊन कोरड्याठाक नदीत पाणी अवतरले. बागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरेसह परिसरामधील गावांतील ग्रामस्थांनी एका दिवसात ५०० मीटर पाटचारी खोदली. त्यामुळे १० गावांचा पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला.कपालेश्वर गावाजवळील हत्ती नदीला गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणीच नसल्याने पात्र कोरडे पडले होते. पठावे लघुसिंचन प्रकल्पातून हत्ती नदीला पाणी येते. तो प्रकल्पच कोेरडाठाक असल्याने नदीला पाणीच नव्हते. कपालेश्वर, किकवारी, विंचुरे व जोरणच्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्याकडे आरम व हत्ती नदी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र आरम नदीतील पाणी थेट हत्ती नदीत आणण्यासाठी अनेक परवानग्या लागणार हे गृहीतधरून पाटील यांनी पाटचारी खोदण्यासाठी लोकसहभागाची संकल्पना मांडली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.दुसऱ्याच दिवशी जेसीबी, इतर यंत्रसामग्रीसह दोनशे ग्रामस्थांनी हाती टिकाव-फावडे घेत पाटचारी खोदकामास सुरुवात केली आणि एका दिवसात काम पूर्ण केले. पाटचारीत सुमारे २४ पाइप टाकण्यात आले. गावकऱ्यांनी पदरमोड करून हा नद्याजोड प्रकल्प साकारला. अनिल पाटील यांनी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून केळझर धरणातून ५५ दलघफू पाणी हत्ती नदीत सोडण्यासाठी हिरवा कंदील मिळविला. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान हत्ती नदी खळाळून वाहिली. शासकीय निधीची वाट पाहत न बसता वीरगाव गटात लोकसहभागातून जवळपास १२ ते १३ प्रकारची विविध कामे करण्यात आली आहेत. त्यात आरम-हत्ती नद्या जोडण्यासाठी पाटचारी खोदण्यासह नालाबांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण कामे केली. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याबरोबरच भूजलपातळीत वाढ झाली आहे.- प्रा. अनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्य, बागलाण