शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा नकार; जिल्हा बँकेचे पुनर्गठनासाठी हात वर

By admin | Updated: June 20, 2015 02:49 IST

कर्ज पुनर्गठन नाही, राज्यभरातील जिल्हा बँकांची अवस्था वाईट.

विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यातील शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज पुनर्गठनास असर्मथता दर्शवली असून, आतापर्यंंत एकाही शेतकर्‍यावरील कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नाबार्डनेच त्यांना मदत देण्यास नकार दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुनर्गठनापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील ७0 टक्के शेतकरी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न आहेत. यामध्ये प्रामुख्याने गरीब व छोट्या शेतकर्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ४१२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून या बँकेचा कारभार चालतो. जिल्हा बँकांना शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्ड आर्थिक मदत करते. शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्ड ६0 टक्के, राज्य सरकार १५ टक्के, राज्य बँक १५ टक्के, तर बँकेचे १0 टक्के अशी एकूण रक्कम गोळा करून शेतकर्‍यांना वाटप केले जाते. दरवर्षी मागील वसुली करून नवीन कर्जपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षी दोन्ही हंगामात शेतकर्‍यांचे नुकसान झाले असल्यामुळे त्यांच्याकडे कर्ज भरण्यासाठी व पेरणी करण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे शासनाने मागील कर्ज न भरता कर्ज पुनर्गठनाचा निर्णय घेतला. नाबार्डने या बँकांना आर्थिक मदत देण्यास नकार दिला. त्यातच कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेने हात वर केले आहेत. नाबार्ड, शासन व बँकेच्या या फेर्‍यात शेतकरी मात्र भरडला जात आहे. आर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळे बँक कर्जांचे पुनर्गठन करू शकत नाही. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ४१२ सहकारी संस्थांमार्फत १७ जूनपर्यंंत ३९ हजार ७२२ शेतकर्‍यांना २५४ कोटी १४ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ५७.२७ असली तरी बँकेच्यावतीने एकाही शेतकर्‍याच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याचे बँकेने जिल्हा अग्रणी बँकेला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँके चे व्यवस्थापक नरेंद्र भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी नाबार्डने आर्थिक मदतीला नकार दिला असल्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे सांगीतले. मात्र त्याच वेळेस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी नाबार्डने आर्थिक मदत दिली नाही म्हणून बँका कर्जाचे पुनर्गठन टाळू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

* इकडे आड तिकडे विहीर

       शेतकर्‍यांचे खाते अनेक वर्षांंपासून याच बँकेत आहे. त्यातच त्यांनी गतवर्षी या बँकेतून पीककर्ज घेतले. त्यांना जिल्हा बँक कर्ज पुनर्गठन करण्यास नकार देत आहे. दुसरीकडे कर्जदार असलेले शेतकरी अन्य राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून नवीन कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची इकडे आड व तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.