शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील पाच जणांचा गूढ मृत्यू!

By admin | Updated: April 22, 2015 04:00 IST

एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह मंगळवारी पहाटे आस्टुल परिसरातील शेतात आढळून आले. तीन मुलांची हत्या करूण आई-वडिलांनी आत्महत्या केली असावी,

पातूर/ शिर्ला (जि. अकोला) : एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह मंगळवारी पहाटे आस्टुल परिसरातील शेतात आढळून आले. तीन मुलांची हत्या करूण आई-वडिलांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़ संजय पूर्णाजी इंगळे (४५), त्यांची पत्नी मनिषा (३५), ऐश्वर्या (१९), मयुरी (१७) रोशन (१५) अशी मृतांची नावे आहेत़ आस्टुल परिसरातील इंगळे याच्या शेतात तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत तर दोन मुलींचे मृतदेह शेतात इतर ठिकाणी आढळून आले. इयत्ता नववीत शिकणाऱ्या रोशनचा मृतदेह फांदीला लटकलेला होता. मयुरीचा ओढणीने गळा आवळलेल्या स्थितीत, तर ऐश्वर्याचा गळा दाबून तिला ठार केल्याचे दिसून आले. आंब्याच्या दुसऱ्या झाडाला पती-पत्नीचे मृतदेह लटकलेले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. संजय इंगळे यांची वडिलोपार्जित ३५ एकर बागायती शेती आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार इंगळे कुटुंबातील सदस्य पिकांना पाणी देण्यासाठी दररोज शेतात जात होते. मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास त्यांना मोटारसायकलने शेताकडे जाताना काही गावकऱ्यांनी बघितले. नेहमीच शेतात जात असल्याने कुणालाही शंका आली नाही. काही वेळानंतर गावातील एक मुलगा परिसरात गेला असता त्याला या पाचजणांचे मृतदेह आढळून आले. पातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले़ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय असून, त्या दिशेने तपास सुरू केल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी सांगितले. (लोकमत चमू)