शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

जलजागृती सप्ताहातच ‘पेयजला’साठी माय-लेकींचा बळी

By admin | Updated: March 17, 2016 23:52 IST

धरणामुळे गावाशी संपर्क तुटला , येळवण वा रिंगणे हे ७ किलोमीटरचे अंतर मुलांना शाळेत जावे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी ओझर -धनगरवाडीला संघर्ष

आनंद त्रिपाठी--वाटूळ  -राज्यभरात जलजागृती सप्ताहाची सुरुवात होत असतानाच पिण्याच्या पाण्यासाठी राजापूर तालुक्यातील ओझर धनगरवाडीमधील मायलेकींचा बळी गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी ओझर - धनगरवाडीमध्ये घडली.ओझर -धनगरवाडी ही गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर वसली आहे. वाडीमध्ये तीस घरे असून, २५०च्या आसपास या वाडीची लोकसंख्या आहे. डोंगरमाथ्यावरील तीन किलोमीटर परिसरात ही ३० घरे वसली असून, या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर खाली उतरुन तेथील धरणातून पाणी घेऊन जावे लागते. पाण्यासाठी दोन किलोमीटरचा डोंगर उतरावा व चढावा लागतो. शासनाने धरण डोंगरपायथ्याशी बांधले. परंतु, त्याच डोंगरावर राहणाऱ्या ३० घरांमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय उपलब्ध केली नाही. ग्रामपंचायतीकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील पाण्याचा कोणताही बंदोबस्त झाला नसल्याची खंत या दुर्दैवी घटनेनंतर धनगरवाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. एवढी मोठी घटना होऊन देखील ग्रामसेवक याठिकाणी साधे फिरकले देखील नाहीत याबाबत वाडीमध्ये असंतोष होता.या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मनिषा कोकरे यांना ५ मुली व १ मुलगा असून, घरातील वृद्ध सासू-सासऱ्यांच्याही त्याच आधार होत्या. पती महादेव कोकरे घटनेच्या दिवशी मजुरीसाठी बाहेर गेले होते. सकाळची शाळा करुन मनिषा कोकरे यांच्या तीन मुली पिण्याचे पाणी आणण्यासाठी धरणावर गेल्या. पैकी दोन मुली पाण्याची एक खेप घेऊन पुन्हा घराजवळ आल्या व त्यातील नववीमध्ये शिकणारी मुलगी स्वाती पुन्हा धरणावर आली. यावेळी धरणाजवळच आई मनिषा या शेळ्या राखत होत्या. धरणाजवळ पाणी भरणारी संगिता (१२) ही पाण्यात पडली. आईने हे पाहताच लागलीच उडी घेतली. संगीताने आईला घट्ट मिठी मारल्याने त्या दोघीही पाण्यात बुडाल्या. भरलेली भांडी ठेऊन स्वाती तेथे आली असता तिच्या डोळ्यासमोर ही दुर्दैवी घटना घडली. आईच्या व बहिणीच्या जाण्याने संपूर्ण कोकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ४ मुली व बारावी झालेला मुलगा, वृद्ध आई-वडील या सर्वांची जबाबदारी आता मजुरी करणाऱ्या महादेव कोकरे यांच्यावर पडली आहे.ओझर गावातील धनगरवाडीमध्ये जाण्यासाठी रस्तादेखील नाही. धरणामुळे गावाशी या वाडीचा संपर्क तुटला असून, येळवण वा रिंगणे हे ६ ते ७ किलोमीटरचे अंतर पार करुन मुलांना शाळेत जावे लागते. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक गरज असणाऱ्या पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी आजही ओझर -धनगरवाडीला संघर्ष करावा लागत आहे. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झोरे व संघटक अनंत झोरे यांनी ही समस्या सरपंचांसमोर ठेवली असून, पाण्यासाठी आमच्या समाजबांधवांना जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुर्दैवी घटना घडली असताना शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नाही.धनगरवाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करु, अशी ग्वाही या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच अंजली राजकुमार कुर्ले यांनी दिली आहे.मृतदेहाला अग्नी देऊन आल्यानंतर मुलाला आंघोळीसाठी पाणी नाही. पिण्याचे पाणी आजूबाजूच्या घरातून दिले जात होते.पोलीसपाटील विलास कुर्ले यांनी अत्यंत तत्परतेने हे प्रक़रण हाताळले. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांमध्ये समाधान होते.२५० ग्रामस्थ असलेल्या ओझर धनगरवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय जीवघेणा संघर्ष.मेहनती मनिषाच्या जाण्याने कोकरे कुटुंबीय उघड्यावर.ओझर धरणापासून २ किलोमीटर चढ्या डोंगरावरील ३ किलोमीटर परिसरात वसली आहे धनगरवाडी.