शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जलजागृती सप्ताहातच ‘पेयजला’साठी माय-लेकींचा बळी

By admin | Updated: March 17, 2016 23:52 IST

धरणामुळे गावाशी संपर्क तुटला , येळवण वा रिंगणे हे ७ किलोमीटरचे अंतर मुलांना शाळेत जावे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी ओझर -धनगरवाडीला संघर्ष

आनंद त्रिपाठी--वाटूळ  -राज्यभरात जलजागृती सप्ताहाची सुरुवात होत असतानाच पिण्याच्या पाण्यासाठी राजापूर तालुक्यातील ओझर धनगरवाडीमधील मायलेकींचा बळी गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी ओझर - धनगरवाडीमध्ये घडली.ओझर -धनगरवाडी ही गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर वसली आहे. वाडीमध्ये तीस घरे असून, २५०च्या आसपास या वाडीची लोकसंख्या आहे. डोंगरमाथ्यावरील तीन किलोमीटर परिसरात ही ३० घरे वसली असून, या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर खाली उतरुन तेथील धरणातून पाणी घेऊन जावे लागते. पाण्यासाठी दोन किलोमीटरचा डोंगर उतरावा व चढावा लागतो. शासनाने धरण डोंगरपायथ्याशी बांधले. परंतु, त्याच डोंगरावर राहणाऱ्या ३० घरांमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय उपलब्ध केली नाही. ग्रामपंचायतीकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील पाण्याचा कोणताही बंदोबस्त झाला नसल्याची खंत या दुर्दैवी घटनेनंतर धनगरवाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. एवढी मोठी घटना होऊन देखील ग्रामसेवक याठिकाणी साधे फिरकले देखील नाहीत याबाबत वाडीमध्ये असंतोष होता.या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मनिषा कोकरे यांना ५ मुली व १ मुलगा असून, घरातील वृद्ध सासू-सासऱ्यांच्याही त्याच आधार होत्या. पती महादेव कोकरे घटनेच्या दिवशी मजुरीसाठी बाहेर गेले होते. सकाळची शाळा करुन मनिषा कोकरे यांच्या तीन मुली पिण्याचे पाणी आणण्यासाठी धरणावर गेल्या. पैकी दोन मुली पाण्याची एक खेप घेऊन पुन्हा घराजवळ आल्या व त्यातील नववीमध्ये शिकणारी मुलगी स्वाती पुन्हा धरणावर आली. यावेळी धरणाजवळच आई मनिषा या शेळ्या राखत होत्या. धरणाजवळ पाणी भरणारी संगिता (१२) ही पाण्यात पडली. आईने हे पाहताच लागलीच उडी घेतली. संगीताने आईला घट्ट मिठी मारल्याने त्या दोघीही पाण्यात बुडाल्या. भरलेली भांडी ठेऊन स्वाती तेथे आली असता तिच्या डोळ्यासमोर ही दुर्दैवी घटना घडली. आईच्या व बहिणीच्या जाण्याने संपूर्ण कोकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ४ मुली व बारावी झालेला मुलगा, वृद्ध आई-वडील या सर्वांची जबाबदारी आता मजुरी करणाऱ्या महादेव कोकरे यांच्यावर पडली आहे.ओझर गावातील धनगरवाडीमध्ये जाण्यासाठी रस्तादेखील नाही. धरणामुळे गावाशी या वाडीचा संपर्क तुटला असून, येळवण वा रिंगणे हे ६ ते ७ किलोमीटरचे अंतर पार करुन मुलांना शाळेत जावे लागते. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक गरज असणाऱ्या पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी आजही ओझर -धनगरवाडीला संघर्ष करावा लागत आहे. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झोरे व संघटक अनंत झोरे यांनी ही समस्या सरपंचांसमोर ठेवली असून, पाण्यासाठी आमच्या समाजबांधवांना जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुर्दैवी घटना घडली असताना शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नाही.धनगरवाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करु, अशी ग्वाही या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच अंजली राजकुमार कुर्ले यांनी दिली आहे.मृतदेहाला अग्नी देऊन आल्यानंतर मुलाला आंघोळीसाठी पाणी नाही. पिण्याचे पाणी आजूबाजूच्या घरातून दिले जात होते.पोलीसपाटील विलास कुर्ले यांनी अत्यंत तत्परतेने हे प्रक़रण हाताळले. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांमध्ये समाधान होते.२५० ग्रामस्थ असलेल्या ओझर धनगरवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय जीवघेणा संघर्ष.मेहनती मनिषाच्या जाण्याने कोकरे कुटुंबीय उघड्यावर.ओझर धरणापासून २ किलोमीटर चढ्या डोंगरावरील ३ किलोमीटर परिसरात वसली आहे धनगरवाडी.