शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताहातच ‘पेयजला’साठी माय-लेकींचा बळी

By admin | Updated: March 17, 2016 23:52 IST

धरणामुळे गावाशी संपर्क तुटला , येळवण वा रिंगणे हे ७ किलोमीटरचे अंतर मुलांना शाळेत जावे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी ओझर -धनगरवाडीला संघर्ष

आनंद त्रिपाठी--वाटूळ  -राज्यभरात जलजागृती सप्ताहाची सुरुवात होत असतानाच पिण्याच्या पाण्यासाठी राजापूर तालुक्यातील ओझर धनगरवाडीमधील मायलेकींचा बळी गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी ओझर - धनगरवाडीमध्ये घडली.ओझर -धनगरवाडी ही गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर वसली आहे. वाडीमध्ये तीस घरे असून, २५०च्या आसपास या वाडीची लोकसंख्या आहे. डोंगरमाथ्यावरील तीन किलोमीटर परिसरात ही ३० घरे वसली असून, या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर खाली उतरुन तेथील धरणातून पाणी घेऊन जावे लागते. पाण्यासाठी दोन किलोमीटरचा डोंगर उतरावा व चढावा लागतो. शासनाने धरण डोंगरपायथ्याशी बांधले. परंतु, त्याच डोंगरावर राहणाऱ्या ३० घरांमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय उपलब्ध केली नाही. ग्रामपंचायतीकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील पाण्याचा कोणताही बंदोबस्त झाला नसल्याची खंत या दुर्दैवी घटनेनंतर धनगरवाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. एवढी मोठी घटना होऊन देखील ग्रामसेवक याठिकाणी साधे फिरकले देखील नाहीत याबाबत वाडीमध्ये असंतोष होता.या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मनिषा कोकरे यांना ५ मुली व १ मुलगा असून, घरातील वृद्ध सासू-सासऱ्यांच्याही त्याच आधार होत्या. पती महादेव कोकरे घटनेच्या दिवशी मजुरीसाठी बाहेर गेले होते. सकाळची शाळा करुन मनिषा कोकरे यांच्या तीन मुली पिण्याचे पाणी आणण्यासाठी धरणावर गेल्या. पैकी दोन मुली पाण्याची एक खेप घेऊन पुन्हा घराजवळ आल्या व त्यातील नववीमध्ये शिकणारी मुलगी स्वाती पुन्हा धरणावर आली. यावेळी धरणाजवळच आई मनिषा या शेळ्या राखत होत्या. धरणाजवळ पाणी भरणारी संगिता (१२) ही पाण्यात पडली. आईने हे पाहताच लागलीच उडी घेतली. संगीताने आईला घट्ट मिठी मारल्याने त्या दोघीही पाण्यात बुडाल्या. भरलेली भांडी ठेऊन स्वाती तेथे आली असता तिच्या डोळ्यासमोर ही दुर्दैवी घटना घडली. आईच्या व बहिणीच्या जाण्याने संपूर्ण कोकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ४ मुली व बारावी झालेला मुलगा, वृद्ध आई-वडील या सर्वांची जबाबदारी आता मजुरी करणाऱ्या महादेव कोकरे यांच्यावर पडली आहे.ओझर गावातील धनगरवाडीमध्ये जाण्यासाठी रस्तादेखील नाही. धरणामुळे गावाशी या वाडीचा संपर्क तुटला असून, येळवण वा रिंगणे हे ६ ते ७ किलोमीटरचे अंतर पार करुन मुलांना शाळेत जावे लागते. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक गरज असणाऱ्या पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी आजही ओझर -धनगरवाडीला संघर्ष करावा लागत आहे. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झोरे व संघटक अनंत झोरे यांनी ही समस्या सरपंचांसमोर ठेवली असून, पाण्यासाठी आमच्या समाजबांधवांना जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुर्दैवी घटना घडली असताना शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नाही.धनगरवाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करु, अशी ग्वाही या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच अंजली राजकुमार कुर्ले यांनी दिली आहे.मृतदेहाला अग्नी देऊन आल्यानंतर मुलाला आंघोळीसाठी पाणी नाही. पिण्याचे पाणी आजूबाजूच्या घरातून दिले जात होते.पोलीसपाटील विलास कुर्ले यांनी अत्यंत तत्परतेने हे प्रक़रण हाताळले. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांमध्ये समाधान होते.२५० ग्रामस्थ असलेल्या ओझर धनगरवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय जीवघेणा संघर्ष.मेहनती मनिषाच्या जाण्याने कोकरे कुटुंबीय उघड्यावर.ओझर धरणापासून २ किलोमीटर चढ्या डोंगरावरील ३ किलोमीटर परिसरात वसली आहे धनगरवाडी.