शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, ९२ टक्के मिळवूनही माझे कुठे चुकले?

By admin | Updated: June 10, 2015 02:03 IST

दहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले.

डॉक्टर दाम्पत्याचे अपेक्षांचे ओझे : मुलीने व्यक्त केली मानसोपचार तज्ज्ञाकडे उद्विग्नताप्रशांत तेलवाडकर, औरंगाबाददहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले. यानंतरही तुमच्या मनासारखे झाले नसेल तर, आई-बाबा मी काय जीव देऊ? अशा शब्दांत औरंगाबादेतील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीने आपली उद्विग्नता मानसोपचार तज्ज्ञाकडे व्यक्त केली़ अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळविल्याचे दु:ख या डॉक्टर दाम्पत्याला बोचत होते. निकालानंतर आई-वडील आणि मुलगी यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांचे मोफत मार्गदर्शन केंद्र गाठले.९२ टक्के गुण मिळविल्यानंतरही रडून रडून मुलीचे डोळे लाल झाले होते. निकालावर नाराज झालेले वडील म्हणाले की, डॉक्टर, मुलीने समाजात माझी मान खाली घातली. मुलगी ९५ किंवा ९६ टक्के गुण मिळविल, अशी अपेक्षा होती, पण पडले ९२ टक्के. मूर्ख मुलीने पेपर सोडविताना वडिलांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करायला पाहिजे होता. वडिलांचे बोलणे थांबवत आई म्हणाली, हिच्यासाठी काय केले नाही आम्ही? गाडी घेतली. मोबाइल घेऊन दिला. मात्र, मुलीने आमचे नाव घालविले. अहो, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या नर्सच्या मुलाला ९४ टक्के गुण मिळाले. आता तिला कोणत्या तोंडाने सांगू की, माझ्या मुलीने ९२ टक्के गुण मिळविले. आई-वडिलांचे हे संवाद ऐकल्यानंतर डॉ. शिसोदे यांनी मुलीशी एकांतात चर्चा केली. ती म्हणाली की, डॉक्टर खरे सांगते की, मी ९५ टक्के मिळविण्यासाठी १०० टक्के प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, तिथपर्यंत नाही पोहोचू शकले. आणखी ३ ते ४ टक्के गुण मिळविण्यासाठी मी काय जीव देऊ? आई-बाबांच्या वागण्याने माझा आत्मविश्वास ढासळला आहे, यापुढे शिकायचेच नाही, असे मला वाटू लागले आहे...हे झाले एक उदाहरण. आणखी एका मुलाचा कॉल आला. ‘डॉक्टर मला यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर बनायचे आहे. मात्र, दहावीच्या परीक्षेत ९० टक्केच गुण मिळाले. गुण कमी मिळाल्याने घरातील सर्व जण मला ९० टक्क्यांचा कलेक्टर, असे चिडवत आहेत. मी काय करू?’ डॉ. शिसोदे म्हणाले की, आई-वडिलांनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, त्यांची क्षमता ओळखून आपण निर्णय घ्यायचा असतो. आई-वडिलांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा. कारण, दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील अंतिम सत्य नव्हे.हेल्पलाइनवर ८३ जणांनी केले कॉल विद्यार्थ्यांसाठी डॉ. संदीप शिसोदे यांनी मोफत हेल्पलाइन सुरू केली आहे. अपेक्षेप्रमाणे मुलीने दहावीत ९५ टक्के गुण न मिळाल्याने सोमवारी दिवसभरात ८३ कॉल आले. प्रत्यक्षात १४ पालक व पाल्य त्यांना भेटून गेले. यात कमी गुण मिळाले म्हणून नाराज झालेल्यांचे फोन अधिक होते.