शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

माझे माहेर पंढरी

By admin | Updated: July 26, 2015 03:08 IST

पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते.

- प्रा.डॉ. सौ. अलका इंदापवार(लेखिका संत ज्ञानेश्वर-तुकाराम विश्व प्रतिष्ठानच्या सहसचिव आहेत.)

पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते. येथे प्रत्यक्ष विठ्ठल भक्तांची वाट पाहत उभा आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘तुका म्हणे पेठ भूमिवरी हे वैकुंठ’पंढरीस दु:ख न मिळे ओखदा। प्रेमसुख सदा सर्वकाळ।पुंडलिके हाट भरियेली पेठ। अवघे वैकुंठ आणियेले।वैकुंठात दु:ख नसते, सुख नेहमी हात जोडून उभे असते, त्याप्रमाणे पंढरपुरात दु:ख औषधालाही सापडणार नाही. पंढरपूरचे सुख इतके घनदाट आहे की, पंढरपूर हे गाव या सुखाने शिगोशिग भरले. तुका म्हणे संत लागलिसे घणी। बैसले राहोनि पंढरीस।।पांडुरंग माझे पिता आहेत तर राही, रखुमाई, सत्यभामा माझ्या माता आहेत. उद्धव अक्रूर, व्यास, अंबरीष, नारदमुनी यांचाही पंढरीत वास आहे. या अभंगाद्वारे संत तुकारामांनी संतांची मांदियाळीच उभी केलेली आहे. ते पुढे म्हणतात, ‘गरुड बंधू लडिवाळ। पुंडलिक याच कवतिक वाटे मज।’ असे संत-महंत मला नातलगांप्रमाणे आप्त वाटतात. पंढरीत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव तर आहेतच; याशिवाय जीवलग असे नामदेव, नागो, नागमिश्र, नरहरी सोनार, राहिदास, सावतामाळी, परिसा भागवत, संत एकनाथ, चोखामेळा हेदेखील आहेत. परमार्थ साधनेत ध्येय असते ते अंतिम सुख म्हणजेच मोक्ष मिळविण्याचे. अत्यंतिक दु:खनिवृत्ती व अविनाशी सुखप्राप्ती याला साधारणत: मोक्ष म्हटले जाते. तो मोक्ष पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांना प्राप्त होतो हे सांगत असताना, पंढरपुरात वारकऱ्यांच्या दया, शांती या दैवी गुणांचे संवर्धन होते व त्यानंतरच ते मोक्षाचे अधिकारी होतात, असे संत तुकाराम सांगतात.मूढ मतिहीन दुष्ट अविचारी। ते होती पंढरी दयारूप।।पंढरपूरचे स्थान माहात्म्य असे आहे की, मूर्ख, मतिमंद, दुष्ट यांचे अविचार जाऊन ते परोपकारी होतात. मनातील मरगळ, नैराश्य नाहिसे होते. वैराग्य, शांती, क्षमा असे दैवी गुण भाविक माणसाच्या मनात निर्माण होतात.पंढरीसी जा रे आलेनि संसारा। दीनाचा सोयरा पांडुरंगा।वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ।मागील परिहार पुढे नाही सीण। जालिया दर्शन एकवेळातुका म्हणे नेदी आणिकांचे हाती। बैसला तो चित्ती निवडेना।।मागील जन्मातील प्रारब्ध व पुढील जन्माचा फेरा विठ्ठल दर्शनानं नाहीसा होतो, असा अनुभव संत तुकोबा सांगतात...तुका म्हणे खरे जाले। एका बोले संताच्या।पंढरी हे स्वर्गीचे सुख देणारे भूवैकुंठ आहे. तेथे वास करणारा, दीनांचा कैवारी पांडुरंग, त्याला संत तुकाराम वारकऱ्यांच्याकडून निरोप पाठवितात.पंढरीस जाते निरोप आइका। वैकुंठनायका क्षेम सांगा।अनाथांचा नाथ हे तुझे वचन। धावे नको दीन गांजो देऊ।भगवंत भेटीची तळमळ, उतावीळता या अभंगातून व्यक्त झालेली आहे. तुकोबा वैकुंठनायकाला आठवण करून देतात की, अनाथांचा तू नाथ आहेस या आपल्या वचनाला विसरून जाऊ नकोस. आम्ही दीन या मायाजंजाळाने गांजून गेलेलो आहोत. तू धावत ये, नि यातून सोडव. संपदा सोहळा नावडे मनाला। करीते टकळा पंढरीचा।जावे पंढरीसी आवडी मनासी। कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे आर्त ज्याचे मनी। त्याची चक्रपाणी वाट पाहे।।सर्व सुखाचे निधान एक विठ्ठलच आहे. त्याच्यापुढे दुसरे कोणतेही सुख आनंददायक न वाटणे ही एकविध भक्ती आहे. भक्तिप्रेमातील ही एकतानता, तदाकारता इतकी शिगेला पोहचते की, पंढरीच्या दर्शनावाचून दूर राहणे म्हणजे अग्नीच्या ज्वाळा सहन कराव्या लागण्याचे दु:ख होते. अशी आपली अत्यंत तरल भावावस्था श्री तुकाराम महाराज व्यक्त करतात.नलगे त्याविण सुखाचा सोहळा। लांगे मज ज्वाळा अग्निचिया।तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय। मग दु:ख जाय सर्व माझे।भगवंताच्या भेटीस असा सर्वस्वाचा त्याग करण्याची संत तुकोबांची विरागीवृत्ती येथे व्यक्त झालेली आहे. संत तुकारामांचे पंढरीप्रेम अनेक अभंगांत व्यक्त झालेले आहे. पंढरीप्रेम, पंढरीची परंपरा, पांडुरंग, पंढरीचा विरह, पंढरीची भौगोलिकता, पंढरी म्हणजे संतसहवास, पंढरी म्हणजे वैकुंठ असे विविध भावतरंग वलयांकित झालेले आहेत. पांडुरंगाप्रमाणे पंढरीही अविनाशी भूवैकुंठ बनले आहे.