शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

माझे माहेर पंढरी

By admin | Updated: July 26, 2015 03:08 IST

पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते.

- प्रा.डॉ. सौ. अलका इंदापवार(लेखिका संत ज्ञानेश्वर-तुकाराम विश्व प्रतिष्ठानच्या सहसचिव आहेत.)

पंढरपूरचा महिमा एवढा अगाध आहे की, त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, कारण इतर तीर्थस्थळे विशिष्ट काळातच फळ देतात, तर पंढरीत सदासर्वकाळ प्रेमसुख मिळते. येथे प्रत्यक्ष विठ्ठल भक्तांची वाट पाहत उभा आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘तुका म्हणे पेठ भूमिवरी हे वैकुंठ’पंढरीस दु:ख न मिळे ओखदा। प्रेमसुख सदा सर्वकाळ।पुंडलिके हाट भरियेली पेठ। अवघे वैकुंठ आणियेले।वैकुंठात दु:ख नसते, सुख नेहमी हात जोडून उभे असते, त्याप्रमाणे पंढरपुरात दु:ख औषधालाही सापडणार नाही. पंढरपूरचे सुख इतके घनदाट आहे की, पंढरपूर हे गाव या सुखाने शिगोशिग भरले. तुका म्हणे संत लागलिसे घणी। बैसले राहोनि पंढरीस।।पांडुरंग माझे पिता आहेत तर राही, रखुमाई, सत्यभामा माझ्या माता आहेत. उद्धव अक्रूर, व्यास, अंबरीष, नारदमुनी यांचाही पंढरीत वास आहे. या अभंगाद्वारे संत तुकारामांनी संतांची मांदियाळीच उभी केलेली आहे. ते पुढे म्हणतात, ‘गरुड बंधू लडिवाळ। पुंडलिक याच कवतिक वाटे मज।’ असे संत-महंत मला नातलगांप्रमाणे आप्त वाटतात. पंढरीत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव तर आहेतच; याशिवाय जीवलग असे नामदेव, नागो, नागमिश्र, नरहरी सोनार, राहिदास, सावतामाळी, परिसा भागवत, संत एकनाथ, चोखामेळा हेदेखील आहेत. परमार्थ साधनेत ध्येय असते ते अंतिम सुख म्हणजेच मोक्ष मिळविण्याचे. अत्यंतिक दु:खनिवृत्ती व अविनाशी सुखप्राप्ती याला साधारणत: मोक्ष म्हटले जाते. तो मोक्ष पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांना प्राप्त होतो हे सांगत असताना, पंढरपुरात वारकऱ्यांच्या दया, शांती या दैवी गुणांचे संवर्धन होते व त्यानंतरच ते मोक्षाचे अधिकारी होतात, असे संत तुकाराम सांगतात.मूढ मतिहीन दुष्ट अविचारी। ते होती पंढरी दयारूप।।पंढरपूरचे स्थान माहात्म्य असे आहे की, मूर्ख, मतिमंद, दुष्ट यांचे अविचार जाऊन ते परोपकारी होतात. मनातील मरगळ, नैराश्य नाहिसे होते. वैराग्य, शांती, क्षमा असे दैवी गुण भाविक माणसाच्या मनात निर्माण होतात.पंढरीसी जा रे आलेनि संसारा। दीनाचा सोयरा पांडुरंगा।वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ।मागील परिहार पुढे नाही सीण। जालिया दर्शन एकवेळातुका म्हणे नेदी आणिकांचे हाती। बैसला तो चित्ती निवडेना।।मागील जन्मातील प्रारब्ध व पुढील जन्माचा फेरा विठ्ठल दर्शनानं नाहीसा होतो, असा अनुभव संत तुकोबा सांगतात...तुका म्हणे खरे जाले। एका बोले संताच्या।पंढरी हे स्वर्गीचे सुख देणारे भूवैकुंठ आहे. तेथे वास करणारा, दीनांचा कैवारी पांडुरंग, त्याला संत तुकाराम वारकऱ्यांच्याकडून निरोप पाठवितात.पंढरीस जाते निरोप आइका। वैकुंठनायका क्षेम सांगा।अनाथांचा नाथ हे तुझे वचन। धावे नको दीन गांजो देऊ।भगवंत भेटीची तळमळ, उतावीळता या अभंगातून व्यक्त झालेली आहे. तुकोबा वैकुंठनायकाला आठवण करून देतात की, अनाथांचा तू नाथ आहेस या आपल्या वचनाला विसरून जाऊ नकोस. आम्ही दीन या मायाजंजाळाने गांजून गेलेलो आहोत. तू धावत ये, नि यातून सोडव. संपदा सोहळा नावडे मनाला। करीते टकळा पंढरीचा।जावे पंढरीसी आवडी मनासी। कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे आर्त ज्याचे मनी। त्याची चक्रपाणी वाट पाहे।।सर्व सुखाचे निधान एक विठ्ठलच आहे. त्याच्यापुढे दुसरे कोणतेही सुख आनंददायक न वाटणे ही एकविध भक्ती आहे. भक्तिप्रेमातील ही एकतानता, तदाकारता इतकी शिगेला पोहचते की, पंढरीच्या दर्शनावाचून दूर राहणे म्हणजे अग्नीच्या ज्वाळा सहन कराव्या लागण्याचे दु:ख होते. अशी आपली अत्यंत तरल भावावस्था श्री तुकाराम महाराज व्यक्त करतात.नलगे त्याविण सुखाचा सोहळा। लांगे मज ज्वाळा अग्निचिया।तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय। मग दु:ख जाय सर्व माझे।भगवंताच्या भेटीस असा सर्वस्वाचा त्याग करण्याची संत तुकोबांची विरागीवृत्ती येथे व्यक्त झालेली आहे. संत तुकारामांचे पंढरीप्रेम अनेक अभंगांत व्यक्त झालेले आहे. पंढरीप्रेम, पंढरीची परंपरा, पांडुरंग, पंढरीचा विरह, पंढरीची भौगोलिकता, पंढरी म्हणजे संतसहवास, पंढरी म्हणजे वैकुंठ असे विविध भावतरंग वलयांकित झालेले आहेत. पांडुरंगाप्रमाणे पंढरीही अविनाशी भूवैकुंठ बनले आहे.