शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

माझी चूक झाली, जयाजी सूर्यवंशी यांची जाहीर माफी

By admin | Updated: June 3, 2017 17:30 IST

मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - माझी चूक झाली असल्याचं सांगत किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. "मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे," असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत. एबीपी माझाच्या कार्यक्रमात पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जयाजी सूर्यवंशी यांनी हा माहिती देत जाहीर माफी मागितली. 
 
 
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र शेतक-यांमध्ये संभ्रमाचं चित्र निर्माण झालं होतं. जयाजी सुर्यवंशी यांनी सरकारशी हातमिळवणी केल्याची टीका होऊ लागली. शेतक-यांसोबत सोशल मीडियावरही जयाजी सुर्यवंशी यांच्यावर रोष व्यक्त होऊ लागला. सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना गळाला लावल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. शेतक-यांमध्येही गट निर्माण झाले, आणि काहींनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय़ घेतला. 
 
 
"माझी चूक झाली, पण मी शेतकऱ्यांसोबत कायम आहे. संप स्थगित केला होता, जर संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकऱ्यांसोबत आहे", असं जयाजी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे, असं त्यांनी सांगितलं. 
 
"माझा बळीचा बकरा झालाय, मी नेता म्हणून सरकारकडे गेलो नाही. माझी चूक झाली, मी बिनशर्त सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो", असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत.
 
"जयाजी सूर्यवंशींनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी पुणतांब्यातील शेतक-यांनी केल्यानंतर जाहीर माफी मागत पुणतांब्यात जाऊन माफी मागायलाही मला कमीपणा वाटणार नाही, मी त्यांचाच मुलगा आहे", असं ते बोलले आहेत.
 
कोअर कमिटीत मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत आणखी सदस्य होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच माझ्या मनात काहीच पाप नाही, सदाभाऊंशी चळवळीतील मैत्री आहे असं सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
नाशिकमध्ये पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शेतकरी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय किसान क्रांतीने घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीला मोठ्या संख्यने शेतकरी उपस्थित होते. पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. बैठकीनंतर संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर किसान क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यभरात पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीने या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. नाशिकमधील बळीराजा संपावर ठाम आहे. नाशिककर बळीराजाचा अद्याप संप सुरू आहे.