शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मुलांची घरवापसी हे माय होम इंडियाचे पुण्याचे काम

By admin | Updated: August 27, 2016 04:24 IST

१२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला.

ठाणे : विविध कारणांमुळे घर सोडून पळालेल्या आणि नंतर आपल्या माणसांच्या भेटीची स्वप्ने पाहणाऱ्या सुमारे १२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाला माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, समाजसेवक विजय कडणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माय होम इंडियाच्या कार्यावर आधारित एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. तसेच राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार देवधर यांनी केला.या वेळी माय होम इंडियाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या शंकर शेठ, शेखर फडके, विलास शिंदे, ज्योती सातपुते, निर्माण राठी, राजेंद्र मेहता, जयवंत मालणकर, दिलीप मालणकर, गजानन रत्नपारखी, स्पार्क इंडिया संस्था यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काही मुले घरातील भांडण, राग, क्लेष यामुळे घर सोडतात. बालगृहातील अशा मुलांना सांभाळून, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून त्यांची घरवापसी करणे, हे मोठे पुण्याचे काम माय होम इंडिया करते आहे, असे मत राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच एखादा मुलगा १० वी नापास झाला की, त्याला आजूबाजूच्या लोकांकडून वारंवार बोलणे ऐकावे लागते आणि त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन ती मुले घर सोडून जातात. हेच ओळखून सरकारने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने तत्काळ दुबार परीक्षा घेऊन संस्थेच्या कार्याला एक प्रकारे हातभारच लावला आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माय होम इंडियाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील जनतेला आपल्याशी जोडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून देशातच अनेक ठिकाणी त्यांना विदेशी समजले जाते. मात्र, हा त्यांचा अपमान आहे. आपल्याइतकेच देशप्रेम, राष्ट्रभक्ती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे त्यांचा अपमान आपण थांबवला पाहिजे, असे मत देवधर यांनी व्यक्त केले. केवळ ईशान्य भारतातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम ‘माय होम इंडिया’ २०१३ पासून करते आहे, असे त्यांनी सांगितले. भारतमातेच्या जयजयकाराने देवधर यांनी आपले मनोगत संपवले.