शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

मुलांची घरवापसी हे माय होम इंडियाचे पुण्याचे काम

By admin | Updated: August 27, 2016 04:24 IST

१२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला.

ठाणे : विविध कारणांमुळे घर सोडून पळालेल्या आणि नंतर आपल्या माणसांच्या भेटीची स्वप्ने पाहणाऱ्या सुमारे १२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाला माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, समाजसेवक विजय कडणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माय होम इंडियाच्या कार्यावर आधारित एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. तसेच राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार देवधर यांनी केला.या वेळी माय होम इंडियाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या शंकर शेठ, शेखर फडके, विलास शिंदे, ज्योती सातपुते, निर्माण राठी, राजेंद्र मेहता, जयवंत मालणकर, दिलीप मालणकर, गजानन रत्नपारखी, स्पार्क इंडिया संस्था यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काही मुले घरातील भांडण, राग, क्लेष यामुळे घर सोडतात. बालगृहातील अशा मुलांना सांभाळून, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून त्यांची घरवापसी करणे, हे मोठे पुण्याचे काम माय होम इंडिया करते आहे, असे मत राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच एखादा मुलगा १० वी नापास झाला की, त्याला आजूबाजूच्या लोकांकडून वारंवार बोलणे ऐकावे लागते आणि त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन ती मुले घर सोडून जातात. हेच ओळखून सरकारने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने तत्काळ दुबार परीक्षा घेऊन संस्थेच्या कार्याला एक प्रकारे हातभारच लावला आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माय होम इंडियाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील जनतेला आपल्याशी जोडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून देशातच अनेक ठिकाणी त्यांना विदेशी समजले जाते. मात्र, हा त्यांचा अपमान आहे. आपल्याइतकेच देशप्रेम, राष्ट्रभक्ती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे त्यांचा अपमान आपण थांबवला पाहिजे, असे मत देवधर यांनी व्यक्त केले. केवळ ईशान्य भारतातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम ‘माय होम इंडिया’ २०१३ पासून करते आहे, असे त्यांनी सांगितले. भारतमातेच्या जयजयकाराने देवधर यांनी आपले मनोगत संपवले.