शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मुस्लिमांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 5, 2016 03:35 IST

देशात हिंदू कोड बिलही आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ आहे. तो तो समाज त्याचे पालन करतो.

कल्याण : देशात हिंदू कोड बिलही आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ आहे. तो तो समाज त्याचे पालन करतो. आता मुस्लिम पर्सनल लॉ बदलण्याचा घाट घातला जात आहे. हा कायदा बदलून मुस्लिमांवर समान नागरी कायदा लादला जात आहे. तलाक ही मुस्लिमांची एकमेव समस्या असल्याचे भासविले जात आहे. जर मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेपाचा प्रय्तन मोदी सरकारने केला, तर त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाजातर्फे देण्यात आला. त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम व कायदेशीर लढा दिला जाईल, असेही समाजातील जाणकारांनी स्पष्ट केले. पश्चिमेतील इलाही बक्श मैदानात गुरुवारी सायंकाळी मजलिसे मुशावरीन मस्जीदे औकाफ यांच्या पुढाकाराने समान नागरी कायदा आणि तलाकपद्धती बंद करण्याच्या सरकारच्या हालचालीच्या विरोधात सभा झाली. याप्रसंगी अध्यक्ष मौलाना अस्मत बुबेरे, हसीममुल्ला कासमी, अब्दुस सलाम, अब्दुल कवी, मुफ्ता हाफिज, फुरकान मुक्री, मुफ्ती सैफ, शरफुद्दीन कर्ते, मोईन डोन, अ‍ॅड. फैसल काजी, प्रा. मोनिसा बुशरा आणि नगरसेवक काशीफ तानकी आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. काजी यांनी सांगितले की, मुस्लिम धर्मात ज्या गोष्टी व्यर्ज्य सांगितल्या आहेत. त्यात तलाक ही परमेश्वराला नापसंत असलेली गोष्ट आहे. पत्नी-पत्नी यांच्यात समझोता न झाल्यास तलाक दिला जातो. उठसूट कोणी तलाक घेत नाही. इतर धर्मात एखादी महिला घटस्फोटासाठी न्यायालयाच्या चकरा मारते. तिला प्रसंगी १०-१२ वर्षांनी न्याय मिळतो. त्यापेक्षा मुस्लिम पर्सनल लॉ मधील तलाक पद्धतीने ती लवकर मुक्त होते. तलाकविषयी अपप्रचार केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेच मत व्यक्त केले आहे की, देशात समान नागरी कायदा लागू होण्यास जोपर्यंत पोषक वातावरण तयार होत नाही. तोपर्यंत तो लागू करता येणार नाही. केंद्राला त्याची आताच का घाई झाली आहे, असा सवालही त्यांनी केला.प्रा. बुशरा यांनी सांगितले की, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा गुजरातमध्ये मुस्लिम महिलांवर बलात्काराच्या घटना झाल्या. तेव्हा त्यांना मुस्लिम महिलांची बाजू घ्यावीशी का वाटली नाही, तेव्हा त्यांनी न्याय का दिला नाही? आता ते पंतप्रधान झाले आहेत. भाजपा सरकारने मुस्लिमांच्या तलाक प्रश्नात हस्तक्षेप करू नये. आहे तोच कायदा चांगला आहे.अध्यक्ष बुबेरे यांनी सांगितले, उपयुक्त नसलेला कायदा लादला जात असेल तर तो नाकारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे. समान नागरी कायदा आणि तलाक पद्धती बंद करण्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. ती अधिक गतिमान केली जाईल. तसेच कायदेशीर लढाईही लढण्यासाठी समाज सज्ज आहे. शरफुद्दीन कर्ते यांनी, टिव्हीवर चमकणाऱ्या महिलांना हाताशी धरून तलाकविषयी अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार मुस्लिम धर्माचे पालन करणाऱ्या महिला मोडीत काढतील, असे त्यांनी सांगितले. >तलाकचे प्रमाण नगण्य : मुस्लिम समाजाच्या अन्यही अनेक समस्या आहेत. मात्र तलाक हीच एकमेव समस्या आहे, असे भासविले जात आहे. प्रत्यक्षात मुस्लिम समाजात तलाकचे प्रमाण हे ०.५३ इतके नगण्य आहे. तरीही हाच प्रश्न मुस्लिमांचा प्रमुख प्रश्न आहे, असे भासवून त्यांच्यावर समान नागरी कायदा लादला जात आहे, अशी भूमिका अन्य मौलवी व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर मांडली.