शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार

By admin | Updated: June 25, 2017 11:16 IST

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर आदी भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे  मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहाटेच्या वेळी कळवा स्थानकाजवळ आणि ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 2, 3 आणि 4 दरम्यान पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. 
चांगली सुरुवात केल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने चिंतेेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, काल सकाळपासून पावसाने मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री पावसाचा जोर वाढला. मुंबई आणि उपनगरांच्या तुलनेत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर आदी भागात पावसाचा जोर अधिक होता.
ठाण्यातील मानपाडा भागात पावसामुळे पालिका कार्यालयाची भिंत कोसळली. त्यात दोन वाहनांचे नुकसान झाले. कळवा आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुकही खोळंबली. कळवा स्थानकात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या काही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. काही वेळाने धिम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पण लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.