शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संगीतातील स्वर हाच ईश्वर आहे

By admin | Updated: January 19, 2015 00:55 IST

संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि

उस्ताद अमजद अली खाँ : नेणारा आणि आणणारा माणसाचा देव एकचनागपूर : संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि शब्दामुळेच ते पराभूतही होतात. संगीत मात्र स्वरांमधून अभिव्यक्त होते. संगीत ही अनुभवाची आणि त्यापलिकडेही अनुभूतीची बाब आहे. ती भावनांची भाषा आहे, माणुसकीची आहे. जगात अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय असले तरी माणसाचा देव एकच आहे. जो या जगात तुम्हाला आणतो आणि घेऊन जातो तो देव एकच. त्याला नाव देण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. माझ्यासाठी स्वर हाच ईश्वर आहे, असे मत ज्येष्ठ सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी रविवारी व्यक्त केले. बुद्ध महोत्सवात त्यांना वादनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता अनेक विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी मी सहसा मौन राहतो कारण त्यानंतर सादरीकरण करायचे असते. मौनामुळे संगीताशी अधिक जुळता येते. कार्यक्रमाला प्रारंभ करेपर्यंत काय वाजवायचे ते ठरले नसते. त्यावेळी जो मूड लागतो त्याप्रमाणे वादन घडत जाते. संगीत हे माणसांना जोडणारे आहे. त्यामुळेच संगीताचा कुठलाच मजहब नाही. हल्ली संगीत गंभीरपणे लोक शिकत नाहीत पण संगीत गंभीरपणे शिकण्याकडे नक्कीच लोक वळतील. सध्या फक्त स्वत:चा अल्बम काढण्यासाठी लोक संगीत शिकत आहेत. पण त्यामुळे संगीत समजत नाही आणि शिकताही येत नाही. ते टिकतही नाही. संगीत समजून घेण्यासाठी शिकले पाहिजे. संगीतात आयुष्याचा अर्थ दडला आहे आणि संगीत माणसाला समृद्धच करते. संगीत शिकणे म्हणजे प्रकाशाचा शोध घेणे आहे. एका अंधाऱ्या पोकळीत घुसून प्रकाशाचा शोध घेत राहणे म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. त्यासाठी पेशन्स लागतोच. शास्त्रीय गायक म्हणायचे आणि सूरांना बांधता येत नसेल तर अर्थ नाही. रंजकता नसेल तर ते संगीत कसे? रसिकांना आपले संगीत आवडायला हवे. सध्या जगातील अनेक देशात भारतीय संगीतासह फ्युजन होते आहे. फ्युजन पेक्षाही कोलॅबरेशन म्हणजे जास्त योग्य होईल, असे ते म्हणाले.