शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

संगीतातील स्वर हाच ईश्वर आहे

By admin | Updated: January 19, 2015 00:55 IST

संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि

उस्ताद अमजद अली खाँ : नेणारा आणि आणणारा माणसाचा देव एकचनागपूर : संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि शब्दामुळेच ते पराभूतही होतात. संगीत मात्र स्वरांमधून अभिव्यक्त होते. संगीत ही अनुभवाची आणि त्यापलिकडेही अनुभूतीची बाब आहे. ती भावनांची भाषा आहे, माणुसकीची आहे. जगात अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय असले तरी माणसाचा देव एकच आहे. जो या जगात तुम्हाला आणतो आणि घेऊन जातो तो देव एकच. त्याला नाव देण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. माझ्यासाठी स्वर हाच ईश्वर आहे, असे मत ज्येष्ठ सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी रविवारी व्यक्त केले. बुद्ध महोत्सवात त्यांना वादनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता अनेक विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी मी सहसा मौन राहतो कारण त्यानंतर सादरीकरण करायचे असते. मौनामुळे संगीताशी अधिक जुळता येते. कार्यक्रमाला प्रारंभ करेपर्यंत काय वाजवायचे ते ठरले नसते. त्यावेळी जो मूड लागतो त्याप्रमाणे वादन घडत जाते. संगीत हे माणसांना जोडणारे आहे. त्यामुळेच संगीताचा कुठलाच मजहब नाही. हल्ली संगीत गंभीरपणे लोक शिकत नाहीत पण संगीत गंभीरपणे शिकण्याकडे नक्कीच लोक वळतील. सध्या फक्त स्वत:चा अल्बम काढण्यासाठी लोक संगीत शिकत आहेत. पण त्यामुळे संगीत समजत नाही आणि शिकताही येत नाही. ते टिकतही नाही. संगीत समजून घेण्यासाठी शिकले पाहिजे. संगीतात आयुष्याचा अर्थ दडला आहे आणि संगीत माणसाला समृद्धच करते. संगीत शिकणे म्हणजे प्रकाशाचा शोध घेणे आहे. एका अंधाऱ्या पोकळीत घुसून प्रकाशाचा शोध घेत राहणे म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. त्यासाठी पेशन्स लागतोच. शास्त्रीय गायक म्हणायचे आणि सूरांना बांधता येत नसेल तर अर्थ नाही. रंजकता नसेल तर ते संगीत कसे? रसिकांना आपले संगीत आवडायला हवे. सध्या जगातील अनेक देशात भारतीय संगीतासह फ्युजन होते आहे. फ्युजन पेक्षाही कोलॅबरेशन म्हणजे जास्त योग्य होईल, असे ते म्हणाले.