शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

मुस्लीम आरक्षणावरून गदारोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:48 IST

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

मुंबई : अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. मात्र, जेव्हा नसीम खान यांच्यासारखे काँग्रेसचे सदस्य जेव्हा या विषयावर बोलतात, तेव्हा गेली १५ वर्षे ते काय करीत होते, असा प्रश्न आम्हाला पडतो. फडणवीस यांनी हाच धागा पकडून काँग्रेसला लक्ष्य केले. मुस्लीम समाज कुणामुळे मागास राहिला, याबद्दल बोलून मला राजकारण करायचे नाही. मात्र, मागच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक योजना राबवून अल्पसंख्याकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काँग्रेससारखे दुटप्पी नाही. राज्यघटनेनुसार जेवढे आरक्षण देय आहे, तेवढेच देण्याची आमची भूमिका आहे. ज्या राज्यांनी वेळोवेळी आरक्षण वाढविण्याची भूमिका घेतली, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आम्ही मतांच्या राजकारणाकरिता काहीही करीत नसल्याने, निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक आमच्यासोबत असतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.