शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

मुस्लीम आरक्षणावरून गदारोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:48 IST

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

मुंबई : अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. मात्र, जेव्हा नसीम खान यांच्यासारखे काँग्रेसचे सदस्य जेव्हा या विषयावर बोलतात, तेव्हा गेली १५ वर्षे ते काय करीत होते, असा प्रश्न आम्हाला पडतो. फडणवीस यांनी हाच धागा पकडून काँग्रेसला लक्ष्य केले. मुस्लीम समाज कुणामुळे मागास राहिला, याबद्दल बोलून मला राजकारण करायचे नाही. मात्र, मागच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक योजना राबवून अल्पसंख्याकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काँग्रेससारखे दुटप्पी नाही. राज्यघटनेनुसार जेवढे आरक्षण देय आहे, तेवढेच देण्याची आमची भूमिका आहे. ज्या राज्यांनी वेळोवेळी आरक्षण वाढविण्याची भूमिका घेतली, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आम्ही मतांच्या राजकारणाकरिता काहीही करीत नसल्याने, निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक आमच्यासोबत असतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.