शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुस्लीम आरक्षणावरून गदारोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:48 IST

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

मुंबई : अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. मात्र, जेव्हा नसीम खान यांच्यासारखे काँग्रेसचे सदस्य जेव्हा या विषयावर बोलतात, तेव्हा गेली १५ वर्षे ते काय करीत होते, असा प्रश्न आम्हाला पडतो. फडणवीस यांनी हाच धागा पकडून काँग्रेसला लक्ष्य केले. मुस्लीम समाज कुणामुळे मागास राहिला, याबद्दल बोलून मला राजकारण करायचे नाही. मात्र, मागच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक योजना राबवून अल्पसंख्याकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काँग्रेससारखे दुटप्पी नाही. राज्यघटनेनुसार जेवढे आरक्षण देय आहे, तेवढेच देण्याची आमची भूमिका आहे. ज्या राज्यांनी वेळोवेळी आरक्षण वाढविण्याची भूमिका घेतली, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आम्ही मतांच्या राजकारणाकरिता काहीही करीत नसल्याने, निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक आमच्यासोबत असतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.