शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

दोनशे रुपयांसाठी दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:54 IST

दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे

नवी मुंबई : दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे. तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते.ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली दोघांचे मृतदेह आढळून आले होते. सकाळी ७.३०च्या सुमारास रहदारी सुरू झाली असता, काही पादचाºयांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, त्यांची ओळख पटली. बाळा उर्फ संदीप गायकवाड (२२) व समीर शेख (२०), अशी दोघा तरुणांची नावे असून ते तुर्भे परिसरातील झोपडपट्टीत राहणारे आहेत. तर घटनास्थळाची हद्द निश्चित झाल्यानंतर सानपाडा पोलीसठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शिवाय, या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्याच्या अनुषंगाने परिमंडळ उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार सानपाडा व तुर्भेपोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. यादरम्यान मयत गायकवाड व शेख विषयी चौकशी करताना त्यांच्या प्रभाकर धोत्रे या तिसºया साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधाकरिता पोलिसांनी झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. त्यावेळी पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.घटनेच्या दोन दिवस अगोदर दोनशे रुपयांवरून प्रभाकर धोत्रे याचे गायकवाड व शेख याच्यासोबत भांडण झाले होते. यामुळे दोघांचाही काटा काढण्याचे धोत्रे याने ठरवले होते. यानुसार मंगळवारी रात्री पुलाखाली एकत्र दारू पिल्यानंतर दोघे जण झोपले असता, धोत्रे याने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते. पोलिसांनी ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.