शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास

By admin | Updated: February 2, 2016 04:19 IST

येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.

म्हारळ : येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली. रणजीत नरहर यशवंतराव (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, पत्नी स्वाती (३८) व दोन मुली श्रद्धा (१४), आर्या (७) यांची त्याने कर्जाला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत हत्या केल्याचा कयास आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी असलेल्या रणजीतने २६ जानेवारी रोजी नातेवाइकांना कुटुंबासोबत शेगाव येथे दर्शनास जात असल्याचे सांगून मोबाइल बंद करून ठेवला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजाऱ्यांना बंद सदनिकेतून दुर्गंधी येत होती. तरीही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, रविवारी रात्री जेव्हा जास्त दुर्गंधी सुटली, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आत प्रवेश केला असता हॉलमध्ये रणजीत पंख्यास नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आणि त्याची पत्नी तेथेच दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळली. दोन्ही मुलीही गळ्यास दोरीने आवळलेल्या अवस्थेत दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आल्या. पहाटे ३च्या दरम्यान सर्व मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.