शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास

By admin | Updated: February 2, 2016 04:19 IST

येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.

म्हारळ : येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली. रणजीत नरहर यशवंतराव (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, पत्नी स्वाती (३८) व दोन मुली श्रद्धा (१४), आर्या (७) यांची त्याने कर्जाला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत हत्या केल्याचा कयास आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी असलेल्या रणजीतने २६ जानेवारी रोजी नातेवाइकांना कुटुंबासोबत शेगाव येथे दर्शनास जात असल्याचे सांगून मोबाइल बंद करून ठेवला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजाऱ्यांना बंद सदनिकेतून दुर्गंधी येत होती. तरीही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, रविवारी रात्री जेव्हा जास्त दुर्गंधी सुटली, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आत प्रवेश केला असता हॉलमध्ये रणजीत पंख्यास नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आणि त्याची पत्नी तेथेच दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळली. दोन्ही मुलीही गळ्यास दोरीने आवळलेल्या अवस्थेत दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आल्या. पहाटे ३च्या दरम्यान सर्व मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.