शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पांढरेंची आत्महत्या की व्यवस्थेने घडवलेली हत्या?--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

मुलांचे भवितव्य टांगणीला : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने तासगाव तालुका काळवंडला--

वासुंबे येथील अशोक पांढरे या तरुण शेतकऱ्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली. गेल्या वर्षभरात तासगाव तालुक्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये आणखी एकाची भर. एवढीच काय ती या आत्महत्येची दखल. मात्र पांढरेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पाहिल्यानंतर, ही आत्महत्या की सुस्तावलेल्या व्यवस्थेने घडवून आणलेल खून, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आत्महत्येने उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. तासगावसारख्या सधन तालुक्यात सातत्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येंनी तालुका काळवंडला आहे.दत्ता पाटील--तासगावतासगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणारे वासुंबे गाव. शहरातील वाढते शहरीकरण या गावापर्यंत येऊन पोहोचले आहे. याच गावाचे अशोक पांढरे हे रहिवासी. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दहावीतून अर्धवट शिक्षण सोडले. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. वडिलांचा सात-बारा अशोक पांढरेंच्या नावावर झाला आणि प्रशासनाच्या नजरेतून अधिकृत शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब झाले. वर्षानुवर्षे कोरडवाहू असणारी दोन एकर जमीन. गेल्या काही वर्षांपासून बागायती शेतीसाठी धडपड सुरू केली. मिळेल ते भांडवल गोळा करून उसाची शेती सुरू केली. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्धा एकर ऊस कारखान्याला पाठविला. त्याचे बिल दोन टप्प्यात, तेही दोन महिन्यांपूर्वी मिळाले. प्रत्येक शेतकऱ्याची शेतीबाबतीत असणारी व्यथा पांढरेंच्याही नशिबी होतीच. उसाचे २२ हजारांचे बिल मिळाले. मात्र मिळालेले उत्पन्न आणि झालेला खर्च, याची सांगड कधीच बसली नाही. रोजगाराचे दुसरे साधन नाही. घरचा खर्च चालविण्यासाठी वर्षभरापूर्वी गाय घेतली. मात्र गाईच्या आजारपणामुळे तोटाच सहन करावा लागला. पुन्हा नव्या जिद्दीने नुकतीच एक गाय खरेदी केली. तिच्या दुधाच्या पैशावर घरखर्चाचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सुरू होता. शेतीसाठी सोसायटी कर्ज घेतले होते. त्यातच वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांकडून हातउसने पैसेही घेतले होते. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च, याचा हिशेब जुळेना. त्यातच मुलांच्या भवितव्याची सतावत असलेली चिंता. या नैराश्येच्या गर्तेत असणाऱ्या पांढरेंनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पांढरेंनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये जन्मदात्या आईला वृध्दापकाळात सुखी ठेवता आले नाही, याचीही खंत व्यक्त केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जमीन विकण्याचाही उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आत्महत्या करण्याऐवजी स्वत:ची जमीन विकण्याचा निर्णय घेतला असता तर...?, असाही प्रश्न अनेकांना पडेल. मात्र जन्मदात्या आईइतकेच काळ्या आईवर प्रेम करणारा कोणताही शेतकरी स्वत:ची जमीन विकण्याचे धाडस करू शकत नाही, हे वास्तव पांढरेंच्या बाबतीतही होते.मुलांच्या भवितव्याचे काय?अशोक पांढरे यांची मोठी मुलगी तासगावात अकरावीत विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. दहावीत तिने ८७ टक्के गुण मिळवून पटवर्धन कन्या प्रशालेत पहिला क्रमांक मिळवला होता. दहावीनंतर अभियंता होण्याची (अभियांत्रिकी पदविका करून पदवी घेण्याची) इच्छा असली तरी तिला घरच्या परिस्थितीमुळे अकरावीला प्रवेश घ्यावा लागला. त्याचीही खंत पांढरेंना होतीच. मुलगा तासगावच्या शाळेत नववीत आहे, तर लहान मुलगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत आहे. पांढरेंच्या आत्महत्येने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.आत्महत्या केवळ पन्नास हजारांसाठी अशोक पांढरे यांनी शेतीसाठी सोसायटीचे १८ हजार रुपये कर्ज घेतले होते, तर उसने घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केल्यानुसार २९ हजार ५०० रुपये होती. कर्जाचा आकडा पन्नास हजारांवर नव्हता. एवढ्याशा रकमेसाठी शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी वेळ शेतकऱ्यांवर का येत आहे, याचा विचार कोठेच होत नाही.