शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: May 7, 2017 21:31 IST

पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 7 - पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असून, चौकशीअंती ६ मे रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भुमन्ना आचेवाड यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्या अधिनस्त असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी समशेर खान समीर खान पठाण (३७, रा. मदिना पाटी) यास श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले. समशेर खान यास कायदेशीररित्या अटक केली नाही. तसेच नातेवाईकांना माहिती दिली नाही. स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली नाही, असे बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन सकाळी ११ ते सायंकाळी ६.२४ वाजेपर्यंत नानलपेठ पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून परभणी शहरातील तीन गुन्ह्यात समशेर खान याचा हात असावा, या संशयावरुन त्यास मारहाण करून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक शेख अब्दुल रौफ, पोलीस हवालदार तुळशीदास देशमुख, पोकॉ. अ. मुश्ताक अ.मजीद यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३३१, ४४८, ३४ भा.दं.वि. अन्वये नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर सुरडकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.