शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मुलीला दलममधून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलाची हत्या

By admin | Updated: August 4, 2016 17:01 IST

नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. ४ : नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री गळा कापून हत्या केल्याची घटना छत्तीसगड सीमेलगत असलेल्या धानोरा तालुक्यातील मोरचूल गावात घडली. या घटनेमुळे माओवाद्यांविषयी तीव्र संताप परिसरात व्यक्त केला जात आहे. या घटनेत ठार झालेल्या मृतकाचे नाव अंकालू नरोटे (५५) रा. मोरचूल तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली असे आहे.

अंकालू नरोटे हे मोरचूल या गावचे रहिवासी आहेत. हे गाव गडचिरोली- धानोरा- राजनांदगाव या आंतरराज्य महामार्गावरील सावरगावपासून तीन किमी अंतरावर वसलेले आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या या गावातील अंकालूची २२ वर्षीय मुलगी सुशीला उर्फ राधा ही नक्षल दलममध्ये काही वर्षांपूर्वी सहभागी झाली. सुशीलाने आता दलम सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, अशी अंकालूची मनापासून इच्छा होती.

त्यांनी ही इच्छा सुशीला उर्फ राधा हिच्याकडे अनेकदा बोलून दाखविली. तू नक्षल दलम सोडून आमच्यासोबत राहण्यासाठी ये, असे ते वारंवार म्हणायचे. या बाबतची माहिती राधा उर्फ सुशीलाने माओवाद्यांकडेही बोलून दाखविली होती. वडिलांचा आपल्यावर सातत्त्याने याबाबत दबाव आहे, असे तिने माओवाद्यांना सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजता मोरचूल गाव गाठले. गावात आल्यावर अंकालू नरोटेचे घर गाठून त्यांना आपल्या ताब्यात घेतले. बेदम मारहाण केली. पोरीला कशाला असा सल्ला देता, यावरून माओवादी संतप्त होते, अशी चर्चा परिसरात आहे.

त्यानंतर माओवाद्यांनी अंकालूची गळा कापून हत्या केली व मृतदेह महामार्गावर आणून टाकला. त्यानंतर नागरिकांनी गुरूवारी सकाळी सावरगाव पोलिसांना याची माहिती दिली. दुपारनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे आणण्यात आला. बऱ्याच काळापासून अंकालू नक्षलवाद्यांच्या हिट लिस्टवर होता, अशी माहिती या घटनेनंतर पुढे आली आहे. गेल्या चार दिवसांत माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेली ही दुसरी हत्या आहे. एटापल्ली तालुक्यात एका युवकावर गोळ्या झाडून त्याला गंभीररित्या जखमी केले. माओवाद्यांचा शहीद सप्ताह ३ आॅगस्ट रोजी संपला. आतातरी हे हत्यासत्र थांबेल काय? असा प्रश्न दुर्गम भागातील नागरिक विचारत आहे.