शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

न झालेल्या खुनाचा खटला; आरोपीस ६ लाख भरपाई!, हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:45 IST

प्रत्यक्षात न झालेल्या एका खुनाच्या खटल्यात आरोपी केल्याने तब्बल १० वर्षे मानसिक आणि शारीरिक त्रास सोसाव्या लागलेल्या पंजाबमधील लुधियाना येथील जवाहरलाल रामतीर्थ शर्मा या व्यक्तीला राज्य सरकारने सहा लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रत्यक्षात न झालेल्या एका खुनाच्या खटल्यात आरोपी केल्याने तब्बल १० वर्षे मानसिक आणि शारीरिक त्रास सोसाव्या लागलेल्या पंजाबमधील लुधियाना येथील जवाहरलाल रामतीर्थ शर्मा या व्यक्तीला राज्य सरकारने सहा लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.ही रक्कम सरकारने शर्मा यांना दोन महिन्यांत चुकती करावी, असा आदेश न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने दिला. यापैकी पाच लाख रुपये शर्मा यांना निष्कारण सोसाव्या लागलेल्या क्लेषाबद्दल तर एक लाख रुपये त्यांना कराव्या लागलेल्या कोर्टकज्ज्यांच्या खर्चापोटी आहे.शर्मा यांना ज्या कथित खुनाबद्दल अटक करून त्यांच्यावर खटला दाखल केला गेला होता त्या प्रकरणाचा तपास मुंबईतील जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या अनुक्रमे शर्मा, व्ही.एन. बनसोडे व आर.आर. यादव या पोलीस निरीक्षकांनी केला होता.यापैकी शर्मा व बनसोडे आता हयात नाहीत तर यादव निवृत्त झाले आहेत. सरकारला वाटल्यास भरपाईची ही रक्कम शर्मा व बनसोडे यांच्या मालमत्तेतून व यादव यांच्याकडून वसूल करावी, असेही न्यायालयाने सांगितले.रईस नवाबुल्लाह खान उर्फ गुड्ड्ू उर्फ लईक या तरुणाच्या खुनाबद्दल जवाहरलाल शर्मा यांच्यावर खटला भरला गेला होता. हा गुड्डू उत्तर प्रदेशातील बरेलीचा आहे व तो जिवंत आहे, असे स्पष्ट होऊनही तपासी अधिकाºयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी शर्मा व अन्य दोन आरोपींवर त्याच गुड्डूच्या खुनाचे आरोपपत्र दाखल केले. अखेर शर्मा यांनीच प्रयत्न करून गुड्डूला सत्र न्यायालयापुढे हजर केले व १९९६पासून सुरू असलेल्या खटल्यातून अखेर २००६मध्ये त्यांना आरोपमुक्त केले गेले.या प्रकरणात तपासी अधिकाºयांची निष्क्रियता, ढिलाई आणि निषाकाळजीपणामुळे शर्मा यांना नाहक त्रास सोसासावा लागला, असे ताशेरे मारताना न्यायालयाने म्हटले की, तपासी अधिकाºयाचे काम केवळ जबाब नोंदविणे व पंचनामे करणे एवढेच नसते. त्याने सत्य शोधून काढण्यासाठी तपास करायचा असतो व ते करत असताना आरोपीच्या बाजूने काही माहिती मिळाली तरी त्याचा फायदा आरोपीला द्यायचा असतो.शर्मा यांच्यासाठी अ‍ॅड. अजित आर. पितळे यांनी तर सरकारसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर एन. बी. पाटील यांनी काम पाहिले.हायकोर्टाचा विरोधाभासपोलिसांना जबाबदार धरून खंडपीठाने आता शर्मा यांना भरपाई देण्याचा आदेश दिला असला तरी खुद्द हायकोर्टाच्याच भूमिकेत विरोधाभास दिसतो. ज्या गुड्डूच्या खुनाबद्दल आपल्यावर खटला सुरू आहे तो जिवंत असल्याने आपल्याला आरोपमुक्त करावे, अशी याचिका शर्मा यांनी सन २००५मध्ये केली होती. तेव्हा न्यायालयाने हा खटल्याच्या वेळी बचावाचा मुद्दा असू शकतो; पण तेवढ्यावरून आरोपमुक्त करता येणार नाही, असे म्हटले होते. आताची शर्मा यांची याचिकाही १० वर्षे प्रलंबित होती. दोन वेळा ती वकिलाच्या गैरहजेरीमुळे फेटाळलीही गेली होती.