शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मदतकार्यासाठी पालिकेचे पथक

By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST

दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले.

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात पावसाने डोंगरकडा कोसळल्याने गाव जमिनीखाली गाडले आहे. या दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले. या पथकात अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून, शोध कार्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य या पथकासमवेत पाठविण्यात आले असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी दिली.> ही दुर्घटना घडल्याची बाब सकाळी समोर आल्यानंतर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेने तत्काळ एक पथक मदतकार्यासाठी पाठविले. त्यानुसार ६ जवानांचा समावेश असलेले अग्निशमन दलाचे एक शोध आणि बचाव पथक दुपारी तीनच्या सुमारास माळीणकडे रवाना करण्यात आले. त्यात चार जवान, एक चालक, तसेच एका अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडे रात्रीच्या मदतकार्यासाठी आवश्यक असलेली बूम लाईटची फायरगाडी, जनसेट, हाय टॉर्च, हेल्मेट टॉर्च, लाईट मास्क, असे बचावाचे अत्याधुनिक साहित्य असल्याचे सोनूने यांनी स्पष्ट केले. दरडी का कोसळताहेत ?> दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्याचं मुख्य कारण जंगलतोड. झाडांची मुळं डोंगराची माती घट्ट धरून ठेवतात. परंतु, झाडं तोडल्यानं आणि सततच्या पावसानं ही माती सैल होते आणि ती ढिगारे किंवा दरडीच्या स्वरूपात खाली येतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्यासाठी जे सुरूंग लावले जातात त्याचाही परिणाम डोंगर कमकुवत होण्यात होतो. त्यामुळंही दरडी कोसळत आहेत.> उन्हाळ्यात कोकणातील डोंगरांना वर्षानुवर्षे वनवे लावले जातात. लाकूड माफिया हे काम बेभोबाट करतात. विजेचा एक खांब जंगलातून न्यायचा असेल, तर त्याला विरोध करणारे वन खाते हे वनवे थांबवू शकत नाही. त्यामुळं दर वर्षी लाखो झाडं भस्मसात होत आहेत. हेच प्रमाण कायम राहिलं,तर कोकणातील डोंगरं उघडी-बोडखी व्हायला वेळ लागणार नाही. असं झाल्यास दरडी कोसळण्याचा धोक कित्येक पटीनं वाढू शकतो. > दुसरीकडं नवी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यत जिकडं तिकडं हितसंबंधीयांनी डोंगर कुरतडलेले दिसतात. हे कोणी थांबवू शकत नाही. कारण हे उद्योग करणारेच सरकारमध्ये आहेत. विकासाच्या गोंडस नावाखाली इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध करणारेही तेच आहेत. त्यामुळे येत्या काही काळात दरडी कासळण्याच्या घटना वाढणार, हे नक्की.> निसर्ग आणि सामान्यांच्या विरोधात सुरू असलेलं हे षड्यंत्र थांबविता येत नाही, तर किमान दरडी कोसळण्याचा ज्या गावांना धोका आहे, अशी गावं धोकारेषेच्या बाहेर हलविली गेली पाहिजेत. तेही होत नाही.  - एस. एम. देशमुख