शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

मदतकार्यासाठी पालिकेचे पथक

By admin | Updated: July 31, 2014 11:03 IST

दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले.

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात पावसाने डोंगरकडा कोसळल्याने गाव जमिनीखाली गाडले आहे. या दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले. या पथकात अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून, शोध कार्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य या पथकासमवेत पाठविण्यात आले असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी दिली.> ही दुर्घटना घडल्याची बाब सकाळी समोर आल्यानंतर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेने तत्काळ एक पथक मदतकार्यासाठी पाठविले. त्यानुसार ६ जवानांचा समावेश असलेले अग्निशमन दलाचे एक शोध आणि बचाव पथक दुपारी तीनच्या सुमारास माळीणकडे रवाना करण्यात आले. त्यात चार जवान, एक चालक, तसेच एका अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडे रात्रीच्या मदतकार्यासाठी आवश्यक असलेली बूम लाईटची फायरगाडी, जनसेट, हाय टॉर्च, हेल्मेट टॉर्च, लाईट मास्क, असे बचावाचे अत्याधुनिक साहित्य असल्याचे सोनूने यांनी स्पष्ट केले. दरडी का कोसळताहेत ?> दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्याचं मुख्य कारण जंगलतोड. झाडांची मुळं डोंगराची माती घट्ट धरून ठेवतात. परंतु, झाडं तोडल्यानं आणि सततच्या पावसानं ही माती सैल होते आणि ती ढिगारे किंवा दरडीच्या स्वरूपात खाली येतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्यासाठी जे सुरूंग लावले जातात त्याचाही परिणाम डोंगर कमकुवत होण्यात होतो. त्यामुळंही दरडी कोसळत आहेत.> उन्हाळ्यात कोकणातील डोंगरांना वर्षानुवर्षे वनवे लावले जातात. लाकूड माफिया हे काम बेभोबाट करतात. विजेचा एक खांब जंगलातून न्यायचा असेल, तर त्याला विरोध करणारे वन खाते हे वनवे थांबवू शकत नाही. त्यामुळं दर वर्षी लाखो झाडं भस्मसात होत आहेत. हेच प्रमाण कायम राहिलं,तर कोकणातील डोंगरं उघडी-बोडखी व्हायला वेळ लागणार नाही. असं झाल्यास दरडी कोसळण्याचा धोक कित्येक पटीनं वाढू शकतो. > दुसरीकडं नवी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यत जिकडं तिकडं हितसंबंधीयांनी डोंगर कुरतडलेले दिसतात. हे कोणी थांबवू शकत नाही. कारण हे उद्योग करणारेच सरकारमध्ये आहेत. विकासाच्या गोंडस नावाखाली इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध करणारेही तेच आहेत. त्यामुळे येत्या काही काळात दरडी कासळण्याच्या घटना वाढणार, हे नक्की.> निसर्ग आणि सामान्यांच्या विरोधात सुरू असलेलं हे षड्यंत्र थांबविता येत नाही, तर किमान दरडी कोसळण्याचा ज्या गावांना धोका आहे, अशी गावं धोकारेषेच्या बाहेर हलविली गेली पाहिजेत. तेही होत नाही.  - एस. एम. देशमुख