शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

त्या गावांसाठी पालिकेचा प्रयत्न

By admin | Updated: June 4, 2015 04:21 IST

कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांचा राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पालिकेत समावेश करण्यात आला असला तरी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे या गावांचा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांचा राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पालिकेत समावेश करण्यात आला असला तरी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे या गावांचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळालेला नाही. मात्र, या २७ गावांच्या समितीत आता फूट पडली असून ५ गावांनी महापालिकेत समाविष्ट होण्याची तयारी दर्शविल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतींचा ताबा घेतला. अद्याप २२ गावे महापालिकेत सहभागी होण्यास तयार नाहीत. या गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत याबाबतचा ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. उसरघर, नांदिवली-अंबरनाथ, नांदिवली-पंचानंद, भोपर आणि सागाव-सागर्ली या ५ ग्रामपंचायतींनी विरोधाचा कोणताही ठराव केला नसल्यामुळे या गावांची महापालिकेत सहभागी होण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला कळविले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना या गावांतील स्थावर आणि जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले असून लेखा विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभागातील कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना पाठविण्यात आले असून बुधवार-गुरुवारी ही कामे पूर्ण होतील, असेही सांगण्यात आले.