शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

नगर परिषदांना स्वायत्तता हवी

By admin | Updated: December 30, 2014 01:35 IST

अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखादी स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे प्रदीर्घ व यशस्वी वाटचाल करीत असताना, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता देणे गरजेचे आहे, त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे कार्यक्रमात केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अलिबाग नगरपरिषदेच्या एका विशेष योजनेस खास बाब म्हणून विशेष अनुदान देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.अलिबाग नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या १२ हजार महिला बचत गटांच्या फेडरेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा या गावी जाणारे रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात येणार असून एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजन आणि विकास करण्यात येणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर अलिबागच्या कोळीवाड्यालाही मदत देण्यात येईल, असे ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, अलिबागचे आमदार पंडीतशेठ पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समीतीच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. नमीता नाईक, आमदार धैयर्शिल पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मॉल्सची निमीर्ती करावी. त्यास राज्य सरकार निश्चित सहाय्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बँकेला दिले.शहर विकास आराखड्यांना तत्काळ मंजुरीची गरजराज्यातील ४८ टक्के लोकसंख्या २६५ शहरांत वास्तव्य करते तर राज्यातील ४४ हजार गावांमध्ये तब्बल ५ कोटी ८ लाख लोक राहातात. राज्याच्या २ लाख २० हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी ६ हजार कोटी रुपये नागरी प्रशासनावर खर्च करावे लागतात. सरकारने वेळीच शहर आराखडे पूर्ण केले शहरे बकाल झाली. याची गांभीर दखल घेऊन २५ शहरांच्या विकास आराखड्यांना तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पुणे व कल्याणचे विकास आराखडे राज्य सरकारकडे आले आहेत. त्यांनाही तत्काळ मंजूरी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.