शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नगर परिषदांना स्वायत्तता हवी

By admin | Updated: December 30, 2014 01:35 IST

अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अलिबाग : अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखादी स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे प्रदीर्घ व यशस्वी वाटचाल करीत असताना, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता देणे गरजेचे आहे, त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे कार्यक्रमात केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अलिबाग नगरपरिषदेच्या एका विशेष योजनेस खास बाब म्हणून विशेष अनुदान देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.अलिबाग नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या १२ हजार महिला बचत गटांच्या फेडरेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा या गावी जाणारे रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात येणार असून एमएमआरडीएच्या माध्यमातून नियोजन आणि विकास करण्यात येणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर अलिबागच्या कोळीवाड्यालाही मदत देण्यात येईल, असे ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, अलिबागचे आमदार पंडीतशेठ पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समीतीच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. नमीता नाईक, आमदार धैयर्शिल पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मॉल्सची निमीर्ती करावी. त्यास राज्य सरकार निश्चित सहाय्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बँकेला दिले.शहर विकास आराखड्यांना तत्काळ मंजुरीची गरजराज्यातील ४८ टक्के लोकसंख्या २६५ शहरांत वास्तव्य करते तर राज्यातील ४४ हजार गावांमध्ये तब्बल ५ कोटी ८ लाख लोक राहातात. राज्याच्या २ लाख २० हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी ६ हजार कोटी रुपये नागरी प्रशासनावर खर्च करावे लागतात. सरकारने वेळीच शहर आराखडे पूर्ण केले शहरे बकाल झाली. याची गांभीर दखल घेऊन २५ शहरांच्या विकास आराखड्यांना तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पुणे व कल्याणचे विकास आराखडे राज्य सरकारकडे आले आहेत. त्यांनाही तत्काळ मंजूरी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.