शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

महापालिकेच्या पथकाची कॅम्पाकोलातून माघार

By admin | Updated: June 20, 2014 13:18 IST

कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २० -कॅम्पाकोलातील बेकायदेशीर घरांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यासाठी गेलेले महापालिकेचे पथक रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे माघारी परतले आहे. वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असे महापालिका अधिका-यांनी स्पष्ट केले.   
वरळीतील कॅम्पा कोला इमारतीतील १०२ बेकायदेशीर घरांवर कारवाई करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जूनमध्ये या बेकायदेशीर घरांवर कारवाई होणार हे स्पष्ट होते. तीन दिवसांपूर्वी इमारतीतील एका वृध्दाचे निधन झाल्याने कारवाई टळली होती. अखेरीस शुक्रवारी सकाळी महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी इमारतीत दाखल झाले. रहिवाशांनी तब्बल दीड ते दोन तास महापालिकेच्या पथकाला इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखून ठेवले. इमारतीत प्रवेशद्वाराजवळच होमहवन केले गेले. महापालिका अधिका-यांनी रहिवाशांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाई झाली तरी चालेल पण मात्र बांधकाम पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली होती. अखेरीस रहिवाशांच्या तीव्र विरोधापुढे नमते घेत अधिका-यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. 
आम्ही रहिवाशांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची माहिती दिली. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आता पुढील निर्णय वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन घेतला जाईल असे या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, कारवाईलाविरोध करण्यासाठी आरपीआय, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. निदर्शने करणा-या काही आरपीआय कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर शिवसेना व भाजपने कॅम्पाकोलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार ठरवले आहे.