शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

महापालिका टोचणार रेल्वे प्रशासनाचे कान

By admin | Updated: August 6, 2016 05:19 IST

गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली.

मुंबई : गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला. पावसाळ्यापूर्वी रेल्वे रुळालगतचे छोटे नाले साफ करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही दरवर्षीप्रमाणे यंदा हेच चित्र असल्याने पालिका आता रेल्वेचे कान टोचणार आहे.गुरुवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेचे दावे फोल ठरवत सखल भाग पाण्याखाली गेले. मात्र पाणी साठल्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूकही काही तासांसाठी ठप्पच होती. सायन, कुर्ला, माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद बंदर येथील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते.या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील आपत्कालीन नियोजनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोट्या नाल्यांच्या साफसफाईसाठी पालिका रेल्वेला ठरावीक रक्कम देत असते. मात्र वारंवार सूचना देऊनही रेल्वे हे छोटे नाले साफ केल्याचा भास निर्माण करते. प्रत्यक्षात पावसाळ्यात रेल्वेच्या साफसफाईची पोलखोल होत असल्याची नाराजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.>पालिका पाठवणार रेल्वे प्रशासनाला पत्र पालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाला या प्रकरणी खरमरीत पत्र लिहिणार आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची नोंद घेण्यात आली आहे. ही निरीक्षणे पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या वृत्ताला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.