शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु

By admin | Updated: July 4, 2016 03:21 IST

जिल्ह्यातील १० नगरपालिकांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यातील १० नगरपालिकांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणानुसार विविध पक्षांनी आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्याचा दौरा लावला आहे, तर काहींनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामाध्यमातून युती, आघाड्या कोणत्या पक्षाबरोबर करायच्या याची चाचपणी करण्यावर प्रथम भर देण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहण्यास सुरुवात झाली आहे.५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने नव्याने पडलेल्या आरक्षणामुळे विविध प्रस्थापितांना आपला प्रभाग सोडून सोयीस्कर प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. या निवडणुकीपासून नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडून द्यायचा असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. त्यामुळे तेथे आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उभे राहणार आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रभागनिहाय पडलेल्या आरक्षणावर चर्चा होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेस आणि शेकाप या समविचारी पक्षांना एकत्र घेण्यावरही विचार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकांची तयारी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रायगडचा दौरा १७ जुलैपासून सुरु करणार आहेत. त्यावेळी ते प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. आरक्षणामुळे चित्र बदलले असल्याने तेथे निवडून येणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आर.सी.घरत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील राजकीय समीकरणे अवलंबून राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.महानगरपालिका जाहीर करुन दुसरीकडे नगर पालिकांच्या निवडणुका घेतल्या जात आहे. असे करून सरकार जनतेच्या डोळ््यात धूळफेक करीत आहे, असे शेकापचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार विवेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरक्षणामुळे काम करणाऱ्यांना कधीच फरक पडत नाही. याही निवडणुकीत शेकापला वातावरण चांगले आहे. जातीय आणि धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आरक्षणामुळे विशेष बदल घडणार नाही. मतदारांची मानसिकता तयार झाली आहे. विकासकामांचा सकारात्मक दृष्टिकोन भाजपाच्या कामी येणार असल्याने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष सतीश धारप यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सुरू असलेला भ्रष्टाचार, टक्केवारी आणि नियोजनशून्य कारभार यावर आमचा जोर राहणार असल्याचे त्यांनी सांगून व्हिजन डॉक्युमेंटवरील काम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. >प्रभात रचनेत बदलरायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, खोपोली, रोहा, मुरुड, माथेरान, महाड, श्रीवर्धन या नगर पालिकांची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे नव्याने निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ जुलै रोजी नगर पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत लॉटरी पध्दतीने काढण्यात आली. ५० टक्के महिलांना आरक्षण पडले आहे.आरक्षण चुकीचे पडल्याने आरक्षणाबाबत काही ठिकाणी हरकती येण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी जिल्ह्यामध्ये स्थिती चांगली आहे. शेकाप जिल्ह्यातून कमी होत असल्याने त्या पक्षाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी राहील, असे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एकूणच जिल्ह्यामध्ये नगर पालिकांच्या निवडणुकीने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.