शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : ५४

By admin | Updated: February 22, 2017 14:13 IST

महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला.

महापालिका : ५४ $$अमरावती : महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेतील ८६ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांनी शिस्तीत रांगा लावून मतदान केले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदानकेंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदारांनी मतदान केले.सन २०१२ ला सुद्धा सरासरी ५४ टक्के मतदार झाले होते. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानानंतर ६२७ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. गुरूवार २३ फेब्रुवारीला येथिल विभागीय क्र ीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रात बसून मतदारांना धमकावण्याचा प्रकार उघड झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी युवा स्वाभिमान कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने मतदारांना एकाच वेळी चार जणांना मतदान करावे लागले. अ,ब,क,ड हा क्रम चुकल्याने काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने मंगळवारी २२ प्रभागातील ८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. (प्रतिनिधी)मोरय्यांना बाहेर काढले४राजापेठ प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवार जयश्री मोरय्या या मतदानकें द्राच्या आवारात बसून मतदारांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. अंबिकानगरस्थित महापालिकेच्या हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदारयादीत नाव सापडेना ४यंदाची सार्वत्रिक निवडणूक चारसद्स्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. सन २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागात घेण्यात आली. या ४३ प्रभागांचे यंदा २२ प्रभागात विलिनीकरण करण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येसोबतच मतदारांची संख्या वाढली. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली. अनेकांना त्यांची नावे मतदारयादीत सापडू शकली नाहीत. तर अनेकांची नावे लगतच्या प्रभागामध्ये दिसून आल्याने मतदारांची वेळेवर धावाधाव झाली.