शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या मुमताज शेख

By संतोष आंधळे | Updated: October 3, 2022 08:17 IST

नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षण जेमतेम नववीपर्यंत... त्यात १५व्या वर्षी लग्न आणि १६व्या वर्षी मातृत्व... नवऱ्याचा जाच वेगळाच... या सर्वांनी अगदी पिचून जाऊन एखादीने वाकडी वाट धरली असती. मात्र, त्यांनी धीरोदात्तपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा निश्चय केला. नवऱ्याच्या जाचापासून थोडा काळ का होईना सुटका व्हावी या हेतूने वस्तीतील संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि आज त्याच ११ हजार कुुटुंबांच्या आधार बनल्या. त्या आहेत चेंबूरच्या मुमताज शेख... बीबीसीने निवडलेल्या जगातील १०० महत्त्वाकांक्षी महिलांच्या यादीतील एक... एकेकाळी स्वतः कौटुंबिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या मुमताज महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांचे संसार टिकविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींत ११ टक्के पुरुषांचाही समावेश आहे.  

२००० साली कोरो इंडिया या सामाजिक संस्थेत काम करत असताना मुमताज यांनी महिलांमध्ये साक्षरता वाढावी यासाठी प्रयत्न केले. स्वत:पासूनच त्यांनी सुरुवात केली. नवऱ्याला तलाक दिला. त्यानंतर समाजाने त्यांना बेदखल केले. आपल्या लहानगीला घेऊन मुमताज जमेल त्या स्थितीत भाड्याच्या घरात राहिल्या. त्याच काळात मुमताज यांना दोन वर्षांची फेलोशिप मिळाली. त्यामुळे दोन पैसे गाठीला आले. त्याच आधारावर काम करत मुलीचा सांभाळ करत वस्त्यांतील महिलांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे त्यांचे काम सुरू राहिले. 

‘राइट टू पी’ चळवळ 

२०११ साली संस्थेतर्फे ‘राइट टू पी’ मोहीम राबविण्यास मुमताज यांनी सुरुवात केली. अनेक स्त्रियांनी त्यात सहभाग घेतला. मोहिमेचे फलित म्हणजे शासन दरबारी हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. सरकारी दफ्तरी  या विषयाची नोंद झाली तसेच ज्या महिला आजही या हक्कासाठी भांडतात त्यांना न्याय मिळतो. पण या विषयावर मोठी जनजागृती झाली असून मोठ्या प्रमाणात शौचालय उभारण्याचे काम या काळात झाले.      

संघर्षाबद्दल मुमताज सांगतात...

‘माझ्या आजवरच्या प्रवासात कोरो इंडिया संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. माझे संपूर्ण शिक्षण संस्थेत आल्यानंतरच पूर्ण झाले. संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांवर आवाज उठवू शकले. या काळात याच संस्थेत कार्यरत असलेल्या राहुल गवारे यांच्याशी विवाह झाला. सध्या आम्ही महिलांवरील हिंसाचार या विषयावर काम करीत आहोत. या अंतर्गत महिलांच्या तक्रारींचे निवारण करणे, समुपदेशन करणे, वाद मिटवणे इत्यादी कामे करत असतो. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वाद कौटुंबिक न्यायालयापर्यंत जातात त्यांना कायदेशीर मदत पोहचविण्याचे कामही आम्ही करतो. या कामात सुजाता भिसे आणि विजूबाई भोसले या सहकाऱ्यांची मोलाची मदत मिळते. आतापर्यंत आम्ही मुंबई, नाशिक आणि  अहमदनगर या भागातील ११,२०० कुटुंबापर्यंत पोहचलो आहोत.’

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navratriनवरात्री