शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

मुंबईचे पाणी टेंशन मिटले

By admin | Updated: September 20, 2016 20:16 IST

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत. वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल इतका हा जलसाठा आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंतचे मुंबईचे पाण्याचे टेन्शन अखेर मिटले आहे.गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. ७० ते ७५ टक्केच तलाव भरले असल्याने वर्षभराची पाण्याची तजवीज करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात ऑगस्ट २०१५ पासून लागू केली. या कपातीची झळ मुंबईकरांना वर्षभर बसली. मात्र यावर्षी उशीरा हजेरी लवणाऱ्या पावसाने दोन महिन्यातच आपला बॅकलॉग भरुन काढला. तरीही सर्वच तलाव भरून वाही पर्यंत साबुरीचा मार्ग अवलंबणारया पालिका प्रशासनाला राजकीय दबावापोटी ही पाणीकपात दोन महिन्यापूर्वीच रद्द करावी लागली,मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावांची पातळी कमी होऊ लागली होती. हीच परिस्थिती काही दिवस कायम राहिल्यास मुंबईकरांवर पाण्याचे संकट घोंगावत होते. मात्र ब्रेक के बाद परतलेल्या पावसाने तलावांमध्ये एकूण ९९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. पुढच्या जुलैपर्यंत मुंबईकरांसाठी हा पाणीसाठा मुबलक असल्याने पालिका अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. प्रतिनिधी चौकट मुंबईत दररोज ३७५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० सेप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवल १० लाख दशलक्ष लिटर्स जलसाठा होता. यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.