शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे पाणी टेंशन मिटले

By admin | Updated: September 20, 2016 20:16 IST

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत. वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल इतका हा जलसाठा आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंतचे मुंबईचे पाण्याचे टेन्शन अखेर मिटले आहे.गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. ७० ते ७५ टक्केच तलाव भरले असल्याने वर्षभराची पाण्याची तजवीज करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात ऑगस्ट २०१५ पासून लागू केली. या कपातीची झळ मुंबईकरांना वर्षभर बसली. मात्र यावर्षी उशीरा हजेरी लवणाऱ्या पावसाने दोन महिन्यातच आपला बॅकलॉग भरुन काढला. तरीही सर्वच तलाव भरून वाही पर्यंत साबुरीचा मार्ग अवलंबणारया पालिका प्रशासनाला राजकीय दबावापोटी ही पाणीकपात दोन महिन्यापूर्वीच रद्द करावी लागली,मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावांची पातळी कमी होऊ लागली होती. हीच परिस्थिती काही दिवस कायम राहिल्यास मुंबईकरांवर पाण्याचे संकट घोंगावत होते. मात्र ब्रेक के बाद परतलेल्या पावसाने तलावांमध्ये एकूण ९९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. पुढच्या जुलैपर्यंत मुंबईकरांसाठी हा पाणीसाठा मुबलक असल्याने पालिका अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. प्रतिनिधी चौकट मुंबईत दररोज ३७५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० सेप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवल १० लाख दशलक्ष लिटर्स जलसाठा होता. यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.