शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

By admin | Updated: March 30, 2015 02:51 IST

ठाणे येथे फुटलेल्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेण्यात आल्यानंतर रविवारी रात्री १० वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.

मुंबई : ठाणे येथे फुटलेल्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेण्यात आल्यानंतर रविवारी रात्री १० वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. सोमवार, सकाळपासून मुंबई शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारी तानसा मुख्य जलवाहिनी ठाणे येथील किसन नगर भागात शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फुटली होती. ७२ इंच व्यासाची ही जलवाहिनी फुटल्याने येथील तब्बल ७०० घरांमध्ये पाणी शिरले. शिवाय १५ घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली. दुर्देव म्हणजे यात १८ जण जखमी झाले तर १५ हजार नागरिकांना याचा फटका बसला. तत्पूर्वी जलवाहिनीचे व्हॉल्व्ह बंद करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शिवाय मुंबईत २० टक्के पाणीकपातही तातडीने लागू करण्यात आली.महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम हाती घेतले, तरी तोवर लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याने रविवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत हे काम सुमारे ५० टक्के पूर्ण झाले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास हे काम पूर्णपणे आटोक्यात आले. आता सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु होईल. परंतु पाण्याचा दाब कमी राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)