शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

By admin | Updated: August 6, 2016 13:16 IST

शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला.

मुंबई : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. प्रतिकूल हवामानाचा परिणाम विमानसेवेवर झाला.शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. तिन्ही मार्गांवरील लोकल सकाळपासून १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चर्चगेट, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होती. नोकरदारांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला, सायन, माटुंगा, मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी १२.0५ दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतरही कुर्ला ते दादरपर्यंतचा लोकल प्रवास अत्यंत धिम्या गतीने होत होता. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून सीएसटी ते कल्याणपर्यंतचा प्रवास करण्यास मुभाही देण्यात आली होती. मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसलेला असतानाच पश्चिम आणि हार्बरवरील लोकलही १०-१५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीचाही वेग कमी झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. वाकोला रामनगर सब-वेजवळ, अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर, परेल टीटी, माटुंगा किंग्ज सर्कल जंक्शन, सायन मुख्याध्यापक भवन, कुर्ला कमानी फिनिक्स मॉलजवळ पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.>म.रे.च्या १२१ लोकल फेऱ्या रद्द दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेला शुक्रवारी मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावला व वेळापत्रकच विस्कळीत झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...आणि समुद्राने कचरा परत केला!मुंबईच्या समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याकडील कचरा समुद्रात फेकण्याची मुंबईकरांची खोड तशी जुनीच. मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले तर तो कुणापुढेच झुकत नाही. शुक्रवारी दुपारी समुद्राला आलेल्या भरतीवेळी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी शहराला जशास तसा परत केला. सकाळपासून पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. या वेळी मरिन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांमुळे समुद्रातील ३ ते ४ टन कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला.