शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

By admin | Updated: August 6, 2016 13:16 IST

शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला.

मुंबई : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. प्रतिकूल हवामानाचा परिणाम विमानसेवेवर झाला.शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. तिन्ही मार्गांवरील लोकल सकाळपासून १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चर्चगेट, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होती. नोकरदारांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला, सायन, माटुंगा, मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी १२.0५ दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतरही कुर्ला ते दादरपर्यंतचा लोकल प्रवास अत्यंत धिम्या गतीने होत होता. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून सीएसटी ते कल्याणपर्यंतचा प्रवास करण्यास मुभाही देण्यात आली होती. मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसलेला असतानाच पश्चिम आणि हार्बरवरील लोकलही १०-१५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीचाही वेग कमी झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. वाकोला रामनगर सब-वेजवळ, अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर, परेल टीटी, माटुंगा किंग्ज सर्कल जंक्शन, सायन मुख्याध्यापक भवन, कुर्ला कमानी फिनिक्स मॉलजवळ पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.>म.रे.च्या १२१ लोकल फेऱ्या रद्द दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेला शुक्रवारी मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावला व वेळापत्रकच विस्कळीत झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...आणि समुद्राने कचरा परत केला!मुंबईच्या समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याकडील कचरा समुद्रात फेकण्याची मुंबईकरांची खोड तशी जुनीच. मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले तर तो कुणापुढेच झुकत नाही. शुक्रवारी दुपारी समुद्राला आलेल्या भरतीवेळी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी शहराला जशास तसा परत केला. सकाळपासून पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. या वेळी मरिन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांमुळे समुद्रातील ३ ते ४ टन कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला.