शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

By admin | Updated: August 6, 2016 13:16 IST

शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला.

मुंबई : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. प्रतिकूल हवामानाचा परिणाम विमानसेवेवर झाला.शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. तिन्ही मार्गांवरील लोकल सकाळपासून १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चर्चगेट, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होती. नोकरदारांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला, सायन, माटुंगा, मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी १२.0५ दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतरही कुर्ला ते दादरपर्यंतचा लोकल प्रवास अत्यंत धिम्या गतीने होत होता. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून सीएसटी ते कल्याणपर्यंतचा प्रवास करण्यास मुभाही देण्यात आली होती. मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसलेला असतानाच पश्चिम आणि हार्बरवरील लोकलही १०-१५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतुकीचाही वेग कमी झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. वाकोला रामनगर सब-वेजवळ, अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर, परेल टीटी, माटुंगा किंग्ज सर्कल जंक्शन, सायन मुख्याध्यापक भवन, कुर्ला कमानी फिनिक्स मॉलजवळ पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.>म.रे.च्या १२१ लोकल फेऱ्या रद्द दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेला शुक्रवारी मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावला व वेळापत्रकच विस्कळीत झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...आणि समुद्राने कचरा परत केला!मुंबईच्या समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याकडील कचरा समुद्रात फेकण्याची मुंबईकरांची खोड तशी जुनीच. मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले तर तो कुणापुढेच झुकत नाही. शुक्रवारी दुपारी समुद्राला आलेल्या भरतीवेळी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी शहराला जशास तसा परत केला. सकाळपासून पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. या वेळी मरिन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांमुळे समुद्रातील ३ ते ४ टन कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला.