शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मुंबईकरांचा घसा बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:54 IST

नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे.

मुंबई : दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवाळीत मुंबईकरांचा घसा बसला असून, ते सर्दी, खोकल्याने त्रस्त झाले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. शेवटच्या आठवड्यात दिवाळीत वातावरणात गारवा आला. सध्या तापमानात बदल होत आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी उकाडा आणि रात्री थंड वातावरण असते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. हे वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने आजार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दिवाळीत अनेक जण डाएट विसरले होते. चकल्या, चिवडा, लाडू, चिरोटे, करंज्या, शंकरपाळ््यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. फराळाच्या तेलकट, तूपकट पदार्थांमुळेही अनेकांच्या घशाला त्रास होत आहे. घसा खवखवणे, घसा बसणे असा त्रास अनेकांना जाणवत आहे. त्याचबरोबरीने फटाक्यांच्या धुराचा त्रासही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फटाक्याच्या धुरामुळे खोकला, डोकेदुखी असा त्रासही वाढला आहे. सर्दी-खोकला, कणकण येणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. दिवाळीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या श्वसनविकाराचा त्रास वाढला आहे. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, तर अस्थमा असणाऱ्या व्यक्तींचा त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईकर आजारी पडल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)>दिवाळीपासून हवामानात बदल झाले आहेत. दिवसा गरम आणि रात्री थंड हवामान असते. त्याचबरोबरीने दिवाळीतील फटाके आणि फराळामुळे घसा दुखणे, घसा बसणे, सर्दी-खोकला असा त्रास वाढला आहे. खाण्यात झालेल्या बदलांमुळे पोटदुखीचा त्रासही काही जणांना झाला आहे. सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. - डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन