शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

मुंबईकरांचा घसा बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:54 IST

नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे.

मुंबई : दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवाळीत मुंबईकरांचा घसा बसला असून, ते सर्दी, खोकल्याने त्रस्त झाले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. शेवटच्या आठवड्यात दिवाळीत वातावरणात गारवा आला. सध्या तापमानात बदल होत आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी उकाडा आणि रात्री थंड वातावरण असते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. हे वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने आजार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दिवाळीत अनेक जण डाएट विसरले होते. चकल्या, चिवडा, लाडू, चिरोटे, करंज्या, शंकरपाळ््यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. फराळाच्या तेलकट, तूपकट पदार्थांमुळेही अनेकांच्या घशाला त्रास होत आहे. घसा खवखवणे, घसा बसणे असा त्रास अनेकांना जाणवत आहे. त्याचबरोबरीने फटाक्यांच्या धुराचा त्रासही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फटाक्याच्या धुरामुळे खोकला, डोकेदुखी असा त्रासही वाढला आहे. सर्दी-खोकला, कणकण येणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. दिवाळीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या श्वसनविकाराचा त्रास वाढला आहे. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, तर अस्थमा असणाऱ्या व्यक्तींचा त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईकर आजारी पडल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)>दिवाळीपासून हवामानात बदल झाले आहेत. दिवसा गरम आणि रात्री थंड हवामान असते. त्याचबरोबरीने दिवाळीतील फटाके आणि फराळामुळे घसा दुखणे, घसा बसणे, सर्दी-खोकला असा त्रास वाढला आहे. खाण्यात झालेल्या बदलांमुळे पोटदुखीचा त्रासही काही जणांना झाला आहे. सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. - डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन