शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

मुंबईकरांचा घसा बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:54 IST

नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे.

मुंबई : दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवाळीत मुंबईकरांचा घसा बसला असून, ते सर्दी, खोकल्याने त्रस्त झाले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. शेवटच्या आठवड्यात दिवाळीत वातावरणात गारवा आला. सध्या तापमानात बदल होत आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी उकाडा आणि रात्री थंड वातावरण असते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. हे वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने आजार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दिवाळीत अनेक जण डाएट विसरले होते. चकल्या, चिवडा, लाडू, चिरोटे, करंज्या, शंकरपाळ््यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. फराळाच्या तेलकट, तूपकट पदार्थांमुळेही अनेकांच्या घशाला त्रास होत आहे. घसा खवखवणे, घसा बसणे असा त्रास अनेकांना जाणवत आहे. त्याचबरोबरीने फटाक्यांच्या धुराचा त्रासही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फटाक्याच्या धुरामुळे खोकला, डोकेदुखी असा त्रासही वाढला आहे. सर्दी-खोकला, कणकण येणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. दिवाळीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या श्वसनविकाराचा त्रास वाढला आहे. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, तर अस्थमा असणाऱ्या व्यक्तींचा त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईकर आजारी पडल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)>दिवाळीपासून हवामानात बदल झाले आहेत. दिवसा गरम आणि रात्री थंड हवामान असते. त्याचबरोबरीने दिवाळीतील फटाके आणि फराळामुळे घसा दुखणे, घसा बसणे, सर्दी-खोकला असा त्रास वाढला आहे. खाण्यात झालेल्या बदलांमुळे पोटदुखीचा त्रासही काही जणांना झाला आहे. सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. - डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन