शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

मुंबईत शाळा झोपलेल्याच!

By admin | Updated: January 17, 2015 06:11 IST

पाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो

लोकमत टीम, मुंबईपाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो, हे या हल्ल्याने अधोरेखित झाले. या निर्दयी दहशतवादाने अनेक दु:खांवर एका गोंडस हसण्याने फुंकर मारणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांना निर्घृणपणे संपवले. या घटनेने जगातील प्रत्येक पालकाच्या मनात काहूर माजले़ माझ्या मुलाची शाळा सुरक्षित आहे का, या प्रश्नाने पालकांची झोप उडाली़ प्रत्येक घराला बेचैन करणाऱ्या या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी ‘टीम लोकमत’ने आकस्मिकपणे मुंबईतील सर्व स्तरातील शाळांना भेट दिली़ या भेटीने मुंबईतील शाळा सुरक्षेच्या बाबतीत अजूनही गाढ झोपेतच असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले़मुुंबई हे दहशवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, हे नव्याने सांगायला नको़ देशात कोठेही हल्ला झाला की मुंबईला सुरक्षेचा इशारा दिला जातो़ गेल्या महिन्यात झालेल्या पेशावर हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांना सुरक्षेचे नियम धाडले़ पेशावर घटनेला आज जवळपास २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत़ असे असताना मुंबईतील शाळांनीही सुरक्षेकडे प्राधान्याने कडेकोट लक्ष देणे आवश्यकच आहे़ शाळा मात्र अजूनही तुटपुंज्या सुरक्षा रक्षकांवर निर्भर आहेत; तर लष्कराच्या शाळांनी शस्त्रधारी जवान ठेवून पाठ थोपटून घेतली आहे. मात्र हे जवानही तितके सतर्क नसल्याचे वास्तव या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले. उच्च न्यायालयानेही एका निकालात मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याचा निर्वाळा दिला आहे़ हा निकाल गेल्या दशकातला आहे़ त्यामुळे शाळांना नव्याने सुरक्षेचे नियम धाडणे तितकेसे व्यवहार्य नाही़ मात्र काही शाळांनी सुरक्षेकडे लक्ष दिले आहे़ पालकाला ओळखपत्र देणे, अनोळखी व्यक्तीला शाळा आवारात न सोडणे यासह सुरक्षेची काळजी घेतली आहे़ मात्र अशा शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच आहेत. अन्य शाळांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळेला किमान एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असल्याचा अनुभव या वेळी ‘टीम लोकमत’ला आला.