शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत शाळा झोपलेल्याच!

By admin | Updated: January 17, 2015 06:11 IST

पाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो

लोकमत टीम, मुंबईपाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो, हे या हल्ल्याने अधोरेखित झाले. या निर्दयी दहशतवादाने अनेक दु:खांवर एका गोंडस हसण्याने फुंकर मारणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांना निर्घृणपणे संपवले. या घटनेने जगातील प्रत्येक पालकाच्या मनात काहूर माजले़ माझ्या मुलाची शाळा सुरक्षित आहे का, या प्रश्नाने पालकांची झोप उडाली़ प्रत्येक घराला बेचैन करणाऱ्या या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी ‘टीम लोकमत’ने आकस्मिकपणे मुंबईतील सर्व स्तरातील शाळांना भेट दिली़ या भेटीने मुंबईतील शाळा सुरक्षेच्या बाबतीत अजूनही गाढ झोपेतच असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले़मुुंबई हे दहशवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, हे नव्याने सांगायला नको़ देशात कोठेही हल्ला झाला की मुंबईला सुरक्षेचा इशारा दिला जातो़ गेल्या महिन्यात झालेल्या पेशावर हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांना सुरक्षेचे नियम धाडले़ पेशावर घटनेला आज जवळपास २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत़ असे असताना मुंबईतील शाळांनीही सुरक्षेकडे प्राधान्याने कडेकोट लक्ष देणे आवश्यकच आहे़ शाळा मात्र अजूनही तुटपुंज्या सुरक्षा रक्षकांवर निर्भर आहेत; तर लष्कराच्या शाळांनी शस्त्रधारी जवान ठेवून पाठ थोपटून घेतली आहे. मात्र हे जवानही तितके सतर्क नसल्याचे वास्तव या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले. उच्च न्यायालयानेही एका निकालात मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याचा निर्वाळा दिला आहे़ हा निकाल गेल्या दशकातला आहे़ त्यामुळे शाळांना नव्याने सुरक्षेचे नियम धाडणे तितकेसे व्यवहार्य नाही़ मात्र काही शाळांनी सुरक्षेकडे लक्ष दिले आहे़ पालकाला ओळखपत्र देणे, अनोळखी व्यक्तीला शाळा आवारात न सोडणे यासह सुरक्षेची काळजी घेतली आहे़ मात्र अशा शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच आहेत. अन्य शाळांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळेला किमान एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असल्याचा अनुभव या वेळी ‘टीम लोकमत’ला आला.