शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: August 15, 2016 05:07 IST

राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू

मुंबई : राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू झाले असून, रविवारी विधान भवन परिसरात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. थेट शेतातून आलेला हिरवागार ताजा भाजीपाला पाहून सुखावलेल्या मुंबईकरांनाही त्यास प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात खरेदी केली.सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन परिसरात रविवारी पहिला आठवडी बाजार भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, खा. अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शेतकरी आठवडी बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांचा समावेश असणार आहे. बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.’ (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या भाजीचे सावंत यांनी दिले पैसे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागातर्फे लावलेल्या स्टॉलवर कुरडू, भारंगी, टाकला या रानभाज्यांसह इतर भाजीपाला घेतला. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांचे पैसे दिले. फडणवीस हे खा. राजू शेट्टी यांच्या स्टॉलवर पोहोचले. ढोबळी मिरची, कारले, हिरव्या मिरच्या तेथील स्टॉलवर होत्या. सदाभाऊ खोत यांनी स्टॉलवरील ताज्या हिरव्या मिरच्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत ‘आमच्या हातात नेहमी मिरच्याच...’ अशी मिश्कील टिप्पणी करताच, मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी हसून दाद दिली. >जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलेली ही दुसरी महत्त्वाकांक्षी योजना आहे. थेट बांधावरच्या शेतकऱ्याला मंत्रालयात आणता आले, याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता आले. या पुढच्या काळात मुंबई उपनगरासह आठवडी बाजारांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आमचे मनोबल वाढले आहे. - सदाभाऊ खोत, पणन राज्यमंत्री>शेतकऱ्यांना अडत्यांपासून मुक्त करून त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य मिळवून देण्यासाठी शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपन्यांनी क्लस्टर तयार करावेत. त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री