शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: August 15, 2016 05:07 IST

राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू

मुंबई : राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू झाले असून, रविवारी विधान भवन परिसरात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. थेट शेतातून आलेला हिरवागार ताजा भाजीपाला पाहून सुखावलेल्या मुंबईकरांनाही त्यास प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात खरेदी केली.सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन परिसरात रविवारी पहिला आठवडी बाजार भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, खा. अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शेतकरी आठवडी बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांचा समावेश असणार आहे. बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.’ (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या भाजीचे सावंत यांनी दिले पैसे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागातर्फे लावलेल्या स्टॉलवर कुरडू, भारंगी, टाकला या रानभाज्यांसह इतर भाजीपाला घेतला. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांचे पैसे दिले. फडणवीस हे खा. राजू शेट्टी यांच्या स्टॉलवर पोहोचले. ढोबळी मिरची, कारले, हिरव्या मिरच्या तेथील स्टॉलवर होत्या. सदाभाऊ खोत यांनी स्टॉलवरील ताज्या हिरव्या मिरच्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत ‘आमच्या हातात नेहमी मिरच्याच...’ अशी मिश्कील टिप्पणी करताच, मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी हसून दाद दिली. >जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलेली ही दुसरी महत्त्वाकांक्षी योजना आहे. थेट बांधावरच्या शेतकऱ्याला मंत्रालयात आणता आले, याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता आले. या पुढच्या काळात मुंबई उपनगरासह आठवडी बाजारांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आमचे मनोबल वाढले आहे. - सदाभाऊ खोत, पणन राज्यमंत्री>शेतकऱ्यांना अडत्यांपासून मुक्त करून त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य मिळवून देण्यासाठी शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपन्यांनी क्लस्टर तयार करावेत. त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री