शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: August 15, 2016 05:07 IST

राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू

मुंबई : राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू झाले असून, रविवारी विधान भवन परिसरात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. थेट शेतातून आलेला हिरवागार ताजा भाजीपाला पाहून सुखावलेल्या मुंबईकरांनाही त्यास प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात खरेदी केली.सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन परिसरात रविवारी पहिला आठवडी बाजार भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, खा. अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शेतकरी आठवडी बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांचा समावेश असणार आहे. बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.’ (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या भाजीचे सावंत यांनी दिले पैसे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागातर्फे लावलेल्या स्टॉलवर कुरडू, भारंगी, टाकला या रानभाज्यांसह इतर भाजीपाला घेतला. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांचे पैसे दिले. फडणवीस हे खा. राजू शेट्टी यांच्या स्टॉलवर पोहोचले. ढोबळी मिरची, कारले, हिरव्या मिरच्या तेथील स्टॉलवर होत्या. सदाभाऊ खोत यांनी स्टॉलवरील ताज्या हिरव्या मिरच्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत ‘आमच्या हातात नेहमी मिरच्याच...’ अशी मिश्कील टिप्पणी करताच, मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी हसून दाद दिली. >जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलेली ही दुसरी महत्त्वाकांक्षी योजना आहे. थेट बांधावरच्या शेतकऱ्याला मंत्रालयात आणता आले, याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता आले. या पुढच्या काळात मुंबई उपनगरासह आठवडी बाजारांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आमचे मनोबल वाढले आहे. - सदाभाऊ खोत, पणन राज्यमंत्री>शेतकऱ्यांना अडत्यांपासून मुक्त करून त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य मिळवून देण्यासाठी शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपन्यांनी क्लस्टर तयार करावेत. त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री