शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

कोकणात मुंबईची प्रतिक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:34 IST

कोकणी माणसाचे मुंबईशी जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच ते राजकीयसुद्धा आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय उलथापालथीची स्पष्टपणे प्रतिक्रियाही येथे उमटते. तशी ती जिल्हा

- वसंत भोसले,  कोल्हापूरकोकणी माणसाचे मुंबईशी जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच ते राजकीयसुद्धा आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय उलथापालथीची स्पष्टपणे प्रतिक्रियाही येथे उमटते. तशी ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही उमटली. कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होता होता तुटली तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे राजकारणही पलटले. परिणामी, रत्नागिरीत शिवसेनेने मुसंडी मारली, तर सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला बहुमताने पुन्हा सत्ता मिळाली. याला संपूर्ण मुंबईच्या राजकारणाची किनार होती.रत्नागिरीत शिवसेना २५ सदस्यांसह गेली पाच वर्षे सत्तेवर होती. ही निवडणूक सुरू होताना इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे आणि नेत्यांमधील गटबाजीमुळे शिवसेना मागे पडेल असा व्होरा होता. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे पोखरत होता. ही संधी साधण्यासाठी भाजपा जोरदार तयारी करीत अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश देत होती. शिवसेनेबरोबर युती करण्याचीही तयारी केली होती, पण मुंबईत युती तुटताच शिवसेना अधिक आक्रमकपणे लढत राहिली. शिवसेनेला बंडखोरांचेच आव्हान असे वाटत होते. त्याचबरोबर भाजपाही आव्हान उभे करीत आहे. मुंबईत युती तुटल्याने भाजपा आव्हान देत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र आले आणि त्याने ५५पैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस गटबाजीमुळे आव्हान उभेच करू शकली नाही. या पक्षाचे सदस्य १९वरून १५पर्यंत घसरले. काँग्रेसची हालत खूपच खराब राहिली. या पक्षाला एकमेव जागा मिळाली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गाचे राजकारणही मुंबईप्रमाणे ढवळून निघाले. शिवसेना आणि भाजपा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान द्यायचे, असे ठरवून गेल्या काही महिन्यांपासून एकत्र येत होते. त्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला होता. या दोन्ही पक्षांची युती झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते. पुन्हा मुंबईचे राजकारण त्यांच्या आडवे आले आणि शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्याने काँग्रेसने मुसंडी मारत ५०पैकी २७ जागा जिंकत राज्यातील काँग्रेसची बहुमत मिळविलेली एकमेव जिल्हा परिषद हा बहुमान पटकाविला. वास्तविक, या जिल्हा परिषदेने विविध पातळीवर उत्कृष्ट काम केले होते, पण केवळ राजकीय ईर्ष्येपोटी काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि भाजपा अशी लढाई झाली. त्यात नारायण राणे यांनी बाजी मारली. भाजपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या होत्या. दोन्ही जिल्ह्यांत मिळून भाजपाला सहाच जागा मिळाल्या. शिवसेनेच्या प्रचाराला कोणीही नेता न येता केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक यांनी किल्ला लढविला. नारायण राणे यांचा पराभव करणारे वैभव नाईक यांचा पुन्हा एकदा कुडाळ मतदारसंघात प्रभाव दिसला.कोकणचे राजकारण मुंबईतील हालचालीमुळे ठरते. तेथील प्रतिक्रिया स्पष्टपणे कोकणात उतरते.त्यांची नजर मुंबईकडे असते. तसेच आताही पुन्हा घडले आहे. नारायण राणे यांनी त्याची संधी सिंधुदुर्गात साधली आणि रत्नागिरीत शिवसेनेने पेटून उठून सत्ता पुन्हा राखली.