शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

मुंबईच्या आमदारांची ‘अळीमिळी गुपचिळी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:10 IST

राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली

मुंबई : राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी दरवर्षी सरासरी ९ हजार ६५५ प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते. याउलट २०१६ साली विधानसभेत केवळ ४ हजार ३४३ म्हणजेच ५० टक्क्यांहून कमी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे.प्रजा फाउंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी चार मंत्री आणि उशिराने निवड झालेल्या आमदार तृप्ती सावंत यांना वगळल्यास उरलेल्या ३१ आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रजाने या वेळी मांडले. त्यात केवळ ७ आमदारांनी एका वर्षात १५० हून अधिक प्रश्न उपस्थित केले. तर १८ आमदारांनी ५० ते १५० प्रश्न उपस्थित केले आहेत. याउलट ६ आमदारांनी वर्षभरात ५० प्रश्नही उपस्थित केले नसल्याची माहिती प्रजाने माहिती अधिकारातून मिळवली आहे.प्रजा फाउंडेशनचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले की, सदनामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची संख्या, आमदारांची उपस्थिती, गुन्हेगारी रेकॉर्ड, कथित किमान भ्रष्टता, संबंधित निर्वाचन क्षेत्रापासून जनतेसाठी कथित सुगम्यता, निर्वाचन क्षेत्रासाठी कथित प्रदर्शक या सर्व गोष्टी समोर ठेवून आमदारांना गुण देण्यात आले आहेत. आमदारांना दिलेल्या गुणतालिकेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर सर्वात शेवटचा क्रमांक भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांचा असून त्यांना प्रजाच्या रिपोर्ट कार्डमध्ये ५० टक्के गुणांचीही कमाई करता आली नाही. सर्वोत्कृष्ट १० आमदारांत पाच आमदार काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे आणि दोन आमदार भाजपाचे आहेत. (प्रतिनिधी)>आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा घसरतोययाआधी २८ आमदारांनी विधानसभेत सरासरी प्रश्न उपस्थित केले होते, तर ५ आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा खालावलेला होता. दरम्यान, एकाही आमदाराने चांगल्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. याउलट या वर्षी एका आमदाराने चांगल्या दर्जाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.मात्र सरासरी दर्जाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांची संख्या २० पर्यंत खालावली असून खालावलेल्या दर्जाचे प्रश्न विचारणाऱ्या आमदारांच्या संख्येत १० पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा खालावतोय, असा आरोप प्रजाने केला आहे.>आमदार साहेब भेटेना...विभागातील समस्या ऐकून घेण्यासाठी मतदारांना आमदारांची उपलब्धता आवश्यक असते. २०११-१४ दरम्यान सरासरी १ आमदाराचा नागरिकांशी उत्तम संपर्क होता. तर १७ आमदार लोकांना सरासरी भेटत असून १५ आमदार नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. याउलट यंदा एकही आमदार उत्तम प्रकारे नागरिकांना वेळ देत नसल्याचे प्रजाने मांडले आहे. तर केवळ ६ आमदार लोकांना सरासरी उपलब्ध होत असून २५ आमदार लोकांना भेटतच नसल्याचे प्रजाने सांगितले.>अमिन पटेल सर्वोत्कृष्ट आमदारकाँग्रेस आमदार अमिन पटेल यांना सर्वोत्कृष्ट आमदाराचा दर्जा प्रजा फाउंडेशनने मांडलेल्या अहवालात मिळाला आहे. आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१६ दरम्यान पटेल यांनी विधानसभेत सर्वाधिक म्हणजेच १ हजार ५५ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल अस्लम शेख (४८७), सुनील प्रभू (२६१) आणि वर्षा गायकवाड (२४०) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या त्यांच्या खालोखाल असलेल्या तिन्ही आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेहून अधिक आहे.