शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या आमदारांची ‘अळीमिळी गुपचिळी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:10 IST

राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली

मुंबई : राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी दरवर्षी सरासरी ९ हजार ६५५ प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते. याउलट २०१६ साली विधानसभेत केवळ ४ हजार ३४३ म्हणजेच ५० टक्क्यांहून कमी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे.प्रजा फाउंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी चार मंत्री आणि उशिराने निवड झालेल्या आमदार तृप्ती सावंत यांना वगळल्यास उरलेल्या ३१ आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रजाने या वेळी मांडले. त्यात केवळ ७ आमदारांनी एका वर्षात १५० हून अधिक प्रश्न उपस्थित केले. तर १८ आमदारांनी ५० ते १५० प्रश्न उपस्थित केले आहेत. याउलट ६ आमदारांनी वर्षभरात ५० प्रश्नही उपस्थित केले नसल्याची माहिती प्रजाने माहिती अधिकारातून मिळवली आहे.प्रजा फाउंडेशनचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले की, सदनामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची संख्या, आमदारांची उपस्थिती, गुन्हेगारी रेकॉर्ड, कथित किमान भ्रष्टता, संबंधित निर्वाचन क्षेत्रापासून जनतेसाठी कथित सुगम्यता, निर्वाचन क्षेत्रासाठी कथित प्रदर्शक या सर्व गोष्टी समोर ठेवून आमदारांना गुण देण्यात आले आहेत. आमदारांना दिलेल्या गुणतालिकेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर सर्वात शेवटचा क्रमांक भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांचा असून त्यांना प्रजाच्या रिपोर्ट कार्डमध्ये ५० टक्के गुणांचीही कमाई करता आली नाही. सर्वोत्कृष्ट १० आमदारांत पाच आमदार काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे आणि दोन आमदार भाजपाचे आहेत. (प्रतिनिधी)>आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा घसरतोययाआधी २८ आमदारांनी विधानसभेत सरासरी प्रश्न उपस्थित केले होते, तर ५ आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा खालावलेला होता. दरम्यान, एकाही आमदाराने चांगल्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. याउलट या वर्षी एका आमदाराने चांगल्या दर्जाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.मात्र सरासरी दर्जाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांची संख्या २० पर्यंत खालावली असून खालावलेल्या दर्जाचे प्रश्न विचारणाऱ्या आमदारांच्या संख्येत १० पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा खालावतोय, असा आरोप प्रजाने केला आहे.>आमदार साहेब भेटेना...विभागातील समस्या ऐकून घेण्यासाठी मतदारांना आमदारांची उपलब्धता आवश्यक असते. २०११-१४ दरम्यान सरासरी १ आमदाराचा नागरिकांशी उत्तम संपर्क होता. तर १७ आमदार लोकांना सरासरी भेटत असून १५ आमदार नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. याउलट यंदा एकही आमदार उत्तम प्रकारे नागरिकांना वेळ देत नसल्याचे प्रजाने मांडले आहे. तर केवळ ६ आमदार लोकांना सरासरी उपलब्ध होत असून २५ आमदार लोकांना भेटतच नसल्याचे प्रजाने सांगितले.>अमिन पटेल सर्वोत्कृष्ट आमदारकाँग्रेस आमदार अमिन पटेल यांना सर्वोत्कृष्ट आमदाराचा दर्जा प्रजा फाउंडेशनने मांडलेल्या अहवालात मिळाला आहे. आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१६ दरम्यान पटेल यांनी विधानसभेत सर्वाधिक म्हणजेच १ हजार ५५ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल अस्लम शेख (४८७), सुनील प्रभू (२६१) आणि वर्षा गायकवाड (२४०) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या त्यांच्या खालोखाल असलेल्या तिन्ही आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेहून अधिक आहे.