शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुंबईचा ‘बेपत्ता’ तरुण पाक लष्कराच्या ताब्यात

By admin | Updated: January 15, 2016 04:23 IST

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. हमीद या मुलाचा शोध घेण्यासाठी या दाम्पत्याने पेशावर उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस्’ याचिका केली आहे. ‘हमीद हा आमच्या कोठडीत असून, त्याच्यावर लष्करी न्यायालयात खटला सुरू आहे,’ असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वकिलाने या याचिकेवरील सुनावणीत बुधवारी सांगितले.‘हमीद अन्सारी हा मुंबईतून एमबीए शिकलेला आहे. २०१२मध्ये तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात गुपचूप गेला व त्यानंतर तो बेपत्ता झाला. आमचा मुलगा किमान जिवंत असल्याचे ऐेकून आम्हाला आनंद झाला,’ असे अन्सारी दाम्पत्याने सांगितले. ‘पाकिस्तानला जाण्यासाठी आम्हाला आतापर्यंत नाकारण्यात आलेला व्हिसा आता दिला जावा, म्हणजे आम्ही त्याला भेटू शकू,’ असे ते म्हणाले.

मुलाखतीसाठी सांगून गेला...‘४ नोव्हेंबर २०१२ रोजी हमीद आम्हाला अफगाणिस्तानात विमानसेवेशी संबंधित कंपन्यांमध्ये थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यूज) असल्याचे व मला त्या द्यायच्या आहेत, असे सांगून गेला. मी अनुभव घेऊन पाच ते सहा महिन्यांत परत येईन आणि नंतर नोकरीसाठी भारतात अर्ज करीन, असे तो म्हणाला होता. १० नोव्हेंबरपर्यंत तो आमच्या संपर्कात होता व त्यानंतर तो बेपत्ता झाला,’ असे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी सांगितले. फौजिया अन्सारी प्राध्यापक आहेत.

आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध...फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘आम्ही त्याच्याशी संपर्क साधू न शकल्यामुळे आम्ही त्याचे फेसबुक अकाउंट उघडले आणि तो ४ ते ५ पाकिस्तानींच्या संपर्कात असल्याचे आमच्या लक्षात आले. तो त्यांच्याशी निमबज्ज मेसेंजरवर चॅटिंगही करायचा. त्याचे पाकिस्तानातील जिरगा येथे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंधही असावेत, असा आमचा संशय आहे व तिच्या पालकांनी त्याला मान्यता दिली नाही. तेथील वनी परंपरेनुसार मुलीच्या कुटुंबाचा ज्या कुटुंबाशी वाद आहे, तो मिटविण्यासाठी त्या कुटुंबात तिचा विवाह केला जातो. हमीदने आम्हाला कधीही त्या मुलीबद्दल सांगितले नाही. आमच्याशी त्याच्या झालेल्या संभाषणातून त्या मुलीची तेथून सुटका करून तिच्याशी त्याला लग्न करायचे आहे, असा संशय आम्हाला आला,’ असे फौजिया अन्सारी म्हणाल्या.फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘हमीद आमचे मित्र ग्राफिक डिझायनर अत्ताऊर रहमान, डॉ. शाझिया खान आणि एमबीए झालेले अब्दुल्ला आणि हुमारिया यांच्या संपर्कात होता. या लोकांनी त्याला काळजी करू नकोस, पाकिस्तानात जा, असे सांगून तुला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते.’अनेकदा व्हिसा नाकारला...‘हमीद बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही वर्सोव्यात दाखल केली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि अफगाणिस्तानचा दूतावास व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिले. त्याला शोधून काढू शकतील, अशा होईल तेवढ्या संस्थांना आम्ही पत्रे लिहिली होती. त्या प्रयत्नांतून आमचा संपर्क पाकिस्तानातील स्थानिक वार्ताहर झीनत शहझादी यांच्याशी झाला आणि त्यांनी त्या मुलीचे वडील, तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतरांशी बोलून आम्हाला मदत केली. शहझादी यांनी आम्हाला तिच्या वडिलांनी तिचे लग्न करून टाकल्याचे सांगितले. तिकडे जाण्यासाठी आम्ही अनेक वेळा व्हिसासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला,’ असे फौजिया म्हणाल्या.‘झीनत शहझादी यांनी चौकशी केली आणि हमीद अत्ता ऊर रहमान यांच्यासोबत दोन दिवस राहिल्याचे त्यात स्पष्ट झाले. पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने कोहट येथील हॉटेलमधून हमीदला अटक केल्याचेही झीनत यांना आढळले. आम्हाला रहमानने हमीदकडील पैसे घेऊन पोलिसांना कळविले असावे, असा संशय आहे.’२० लाखांहून अधिक खर्च...हमीदचे वडील निहाल अन्सारी म्हणाले की, ‘पाकिस्तानातील रोटरी क्लबचे सदस्य अदनान रोहेल्ला यांच्याशी झीनतचा संपर्क करून देण्यात आला व अदनान यांनी हमीदच्या फेसबुक अकाउंटवर फ्रेंडस् रिक्वेस्ट पाठविली. आम्ही त्यांना (अदनान रोहेल्ला) सर्वकाही खुलासा करून सांगितले व त्यांच्या सूचनेवरून गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी हेबियस कॉर्पस अर्ज दाखल केला. आमच्यासाठी धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी आॅगस्टपासून झीनत शहझादीच बेपत्ता आहेत. त्यांचेही अपहरण झाल्याची भीती आम्हाला वाटत आहे. प्रसार माध्यमात आलेल्या वृत्तांवरून हमीदवर तेथील लष्करी न्यायालयात खटला सुरू असल्याचे आम्हाला समजले,’ असेही निहाल अन्सारी म्हणाले. ‘या सगळ््या प्रकरणात आम्ही २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. हमीद सुटून यावा, अशी आम्हाला आशा आहे. झीनतबद्दलही आम्हाला काळजी वाटते. त्या सापडतील अशी आशा आहे. आम्ही दोन्ही सरकारांना यात हस्तक्षेप करून हमीदला सोडून देण्याचे आवाहन करतो,’ असे निहाल आणि फौजिया अन्सारी यांनी केले.