शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबईतील घरे स्वस्त होणे अशक्य !

By admin | Updated: March 30, 2015 02:48 IST

नव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात

संदिप प्रधान, मुंबईनव्या प्रस्तावित विकास आराखड्यात अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने घरे स्वस्त होतील, असा दावा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ते अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रस्तावित विकास आराखड्याविषयी महापालिका आयुक्तांनी सादरीकरण केले. मात्र रेडी रेकनरच्या दराच्या ७५ टक्के आणि १०० टक्के प्रिमीयमची रक्कम भरून एफएसआय खरेदी करण्याची असलेली तरतूद आणि बाजारातून विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) खरेदी करून वापरण्याची मुभा यामुळे यापुढे बृहन्मुंबईत सरसकट ५० मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारती उभ्या राहतील व त्या इमारतींमधील घरे स्वस्त असणार नाहीत, असे मत शिवसेनेच्या आमदारांनी सादरीकरणा दरम्यान नोंदवले.सध्या मुंबईतील दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी ९ चौ.मी. आहे. २०३४ सालापर्यंत आर्थिक संपन्नतेमुळे हे दरडोई वापरले गेलेले बांधीव क्षेत्र सरासरी २७ चौ.मी. असेल, असा विकास आराखड्यातील अंदाज आहे. ४५८ चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या बृहन्मुंबईतील १४० चौ.कि.मी. जमिनीचाच केवळ बांधकामाकरिता वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे १ कोटी ४० लाख अंदाजित लोकसंख्येकरिता ४४० चौ.कि.मी. बांधीव क्षेत्राची गरज असेल. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणारे टॉवर बांधणे अपरिहार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. याकरिता सरसकट बृहन्मुंबईत ३.१५ एवढा एफएसआय देणे गरजेचे आहे. बेकायदा बांधकामांची कबुलीबृहन्मुंबईचा पहिला विकास आराखडा १९६६-६७ साली दहा वर्षांकरिता तयार केला गेला. त्यानंतर दुसरा विकास आराखडा १९७६ मध्ये अमलात यायला हवा होता. मात्र विकास आराखड्याचे प्रारुप १९८४ साली प्रसिद्ध झाले. लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यास १९८९ साल उजाडले. सरकारने १९९१ ते ९४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने या विकास आराखड्याला मंजुरी दिली गेली. याचा अर्थ तब्बल १५ वर्षे देशाच्या आर्थिक राजधानीला विकास आराखडा नव्हता. १९९१ च्या या विकास आराखड्यातील केवळ ३५ टक्के आरक्षणे अमलात आली. उर्वरित ६५ टक्के आरक्षणे आता नव्या आराखड्यात रद्द केली आहेत. आता या जमिनीवर झोपड्या व बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची कबुली आराखड्यात दिलेली आहे.मोकळ््या जागांचे दिवास्वप्नबृहन्मुंबईतील दरडोई मोकळी जागा १.०९ चौ.मी. आहे. देशाच्या राजधानीत ती ४.५ चौ.मी. आहे. प्रस्तावित विकास आराखड्यात ती २ चौ.मी. करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. याकरिता १४ चौ.कि.मी. अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध करावी लागेल. पर्यावरणवाद्यांनी मुंबईत दरडोई ६ चौ.मी. मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला आहे. ही मागणी स्वीकारायची झाली तर बांधकामास उपलब्ध १४० चौ.कि.मी. जमिनीपैकी ५६ चौ.कि.मी. जमीन मोकळी ठेवावी लागेल. एवढ्या मोठ्या जमिनीवरील ५८ लाख लोकांचे पुनर्वसन करणे अशक्य असल्याचे महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंनी सांगितले.