शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुंबईकरांचा ‘मार्ग’ होणार सोपा

By admin | Updated: November 5, 2016 03:54 IST

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रस्त्यांचे नामकरण केले खरे

मुंबई : नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रस्त्यांचे नामकरण केले खरे. मात्र या रस्त्यांचे नामफलक बऱ्याच ठिकाणी नसल्याने इच्छित मार्गावर जाण्यासाठी मुंबईकरांना वाट शोधावी लागते. ही शोधाशोध थांबण्यासाठी महापालिकेने १९० ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्याचा निर्णय घेतला आहे.हे फलक ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या मानकांनुसार असणार आहेत. यापैकी ९० फलक हे मोठ्या आकाराचे असून, १०० फलक हे छोट्या आकाराचे असणार आहेत. दादाभाई नौरोजी मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग (वरळी सी फेस रोड), सेनापती बापट मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, प्रा. ना. सी. फडके मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग यासह अनेक महत्त्वाच्या मार्गांवरती हे दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (गेट-वे आॅफ इंडियाजवळील रिगल सिनेमाजवळ), वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा), हाजीअली जंक्शन, महाराणा प्रताप जंक्शन, कामगार रुग्णालय जंक्शन यांसारख्या महत्त्वाच्या चौकांमध्येही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांनी दिली आहे.मार्गावर दोन प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत. मोठ्या फलकाचा आकार हा ४.५ मीटर लांबी व १.८ मीटर उंची असणार आहे. ज्या खांबावरती हे मोठे फलक बसविण्यात येणार आहेत, त्या खांबाची उंची ७.८ मीटर एवढी असणार आहे. या प्रकारचे ९० मोठे दिशादर्शक फलक प्रामुख्याने रस्ते दुभाजकांवर खांब बसवून लावण्यात येणार आहेत. यापैकी काही फलक हे खांबाच्या एकाच बाजूला एकेरी पद्धतीने, तर काही फलक हे खांबाच्या दोन्ही बाजूला दुहेरी पद्धतीने असणार आहेत. या सर्व फलकांच्या पुढच्या बाजूला ठिकाणांची नावे असण्यासोबतच फलकाच्या मागील बाजूला जनजागृतीपर सामाजिक संदेश असणार आहेत. (प्रतिनिधी)>पहिल्यांदाच बसवले जाणार मोठे फलकमहापालिकेद्वारे एवढ्या मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक हे पहिल्यांदाच बसविले जाणार आहेत. तसेच हे फलक बसविण्यासाठी काही ठिकाणी क्रेनचाही वापर करावा लागणार आहे.मोठ्या आकाराच्या ९० दिशादर्शक फलकांची माहिती देण्यासाठी संबंधित पदपथांवर छोटे दिशादर्शक फलकदेखील लावण्यात येणार आहेत.या दिशादर्शक फलकांवर महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत असेल. या फलकांचा आधारभूत रंग निळा असणार असून, अक्षरांचा रंग पांढरा असेल.फलक विशिष्ट प्रकारचे नटबोल्ट वापरून रस्ते दुभाजकांवर वा पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात फलक किंवा फलक बसविलेला खांब निरुपयोगी झाल्यास केवळ निरुपयोगी झालेला भाग बदलणे शक्य होणार आहे.दिशादर्शक फलक पुढील तीन महिन्यांत बसविणे अपेक्षित आहे. मात्र मेट्रो रेल्वेची कामे, विविध उपयोगितांच्या वाहिन्यांचे जाळे यामुळे दिशादर्शक फलक बसविण्याच्या वेळापत्रकात व स्थानात बदल होऊ शकतो.काही बाबतींत वाहतूक पोलीस व पुरातन वारसा जतन समिती यांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील आवश्यक आहे.