शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 25, 2017 18:35 IST

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना भवनात उद्दव ठाकरे यांची सेनेच्या नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. यासोबतच प्रलोभने, अमिषांन बळी पडू नका असं आवाहन त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केलं आहे. मतदार यादीत घोळ नसता तर चित्र वेगळं असतं असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर आमचाच होणार असं म्हटलं होतं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला युतीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला नसून, खोट्या बातम्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्याचा दावा केला होता. 
 
(शिवसेनेने पाठिंब्यासाठी विचारले होते - संजय निरुपम)
 
दुसरीकडे मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय रॅलीत बोलताना ,'भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात', असं म्हटलं आहे.  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेसला सोबत घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. 
 
(फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब)
 
मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. मनपा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनासाठी  दोन्ही पक्षांकडून सत्तेची समिकरणं जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
(काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी)
 
यावर शिवसेनेने पाठिंब्यासाठी प्रस्ताव दिल्याचे समजले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास आमचा नकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले. तसेच छोटे पक्ष मिळून महापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितले.  संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, शिवसेनेकडून याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 
 
तर दुसरीकडे, 'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.