शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अंमलबजावणीत मुंबईच ठरली अव्वल

By admin | Updated: April 29, 2015 02:04 IST

राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

राहुल कलाल - पुणेतब्बल ३० आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचवेळी पुणे जिल्हा मात्र योजनेच्या अंमलबजावणीत तळाशी असल्याचे चित्र आहे. सोलापूर, नांदेड, अमरावतीसारख्या तुलनेने छोट्या जिल्ह्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.वैद्यकीय खर्चात भरमसाठ प्रमाणात वाढ झाल्याने गरिबांना असाध्य आजारावर उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. अवघ्या तीन वर्षांत या योजनेअंतर्गत राज्यात ४ लाख ८१ हजार २६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचवेळी अत्याधुनिक उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी राहत असलेल्या पुण्यात मात्र या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ दरम्यान पुण्यात केवळ १४ हजार २२४ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.अहमदनगर, अमरावती, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांनी ही योजना पुण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने राबविली. जिल्हारुग्णांवर उपचार मुंबई व उपनगर१,१२,७०६सोलापूर३४,२२२नांदेड२९,४५१ठाणे२४,४९२अमरावती२४,३९५रायगड२०,४२९नाशिक१८,६२७कोल्हापूर१७,८४७अहमदनगर१७,२७२जळगाव१७,०८९पुणे१४,२२४