शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियोजन वाऱ्यावर

By admin | Updated: June 13, 2016 05:25 IST

द्यापीठाच्या विविध कामांत सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नव्या कंपनीला कंत्राट दिले

मुंबई : विद्यापीठाच्या विविध कामांत सुसूत्रता आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नव्या कंपनीला कंत्राट दिले असले, तरी परीक्षेसंबंधीची कामे अद्यापही कोणावरच सोपविली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठ व्यवस्थापनातील या गोंधळाला नव्या यंत्रणेनंतर पूर्णविराम मिळेल, अशी आशा असतानाच परीक्षेसंदर्भातील नियोजनाबाबत काहीच पावले उचलण्यात येत नसल्याने याबाबतचे कामकाज चालणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विद्यापीठांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी विद्यापीठाने एमकेसीएल कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र त्यांच्याकडून यासंदर्भातील कामकाज नीट होत नव्हते. परिणामी विद्यापीठाने याकामाकरिता नव्याने निविदा मागविल्या. त्यानंतर अखेरीस विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी ‘एक्झॉन कंपनीला’ कंत्राट दिले. हे कंत्राट तीन वर्षांसाठीचे असून, करारानुसार ही कंपनी फक्त ‘प्रवेशपूर्व नोंदणी’ आणि ‘पात्रता तपासणी’ ही दोनच कामे करणार आहे. परीक्षांच्या नियोजनामुळे नेहमीच विद्यापीठाच्या कामकाजावर टीका होते. आताही याबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत असल्याने परीक्षांचे हॉल तिकीट बनवणे आणि वितरीत करणे, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर आणि परीक्षेसंदर्भातील कैक कामे कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षापासून पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका स्वत: तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाने घेतली आहे. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विविध परीक्षांसाठीची कामे सप्टेंबरमध्ये सुरू होणे अपेक्षित असते. मात्र सद्य:स्थितीत विद्यापीठाकडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे. (प्रतिनिधी)बोजा कमी होईना तांत्रिक अडचण सांगत विद्यापीठाचा तृतीय वर्ष बीकॉमचा निकाल पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली होती. या निकालाव्यतिरिक्त अन्य निकालही लागले नाहीत. त्यातच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांची संख्या ७४२ पर्यंत गेली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या संख्येतही तुरळक वाढ केल्याने विद्यापीठ कामकाजाचा बोजा कमी होण्याची चिन्हे नाहीत.विद्यापीठाच्या सुरळीत कामकाजासाठी नव्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांची ‘नोंदणी’ आणि पात्रता’ तपासणीचे कामकाज करेल. मात्र परीक्षेसंदर्भात कामे करण्यासाठी विद्यापीठाकडे सध्या तरी कोणतीच यंत्रणा नाही. परीक्षांच्या कामकाजासाठी नव्याने पुन्हा निविदा मागवण्यात येणार आहेत. याकरिता विद्यापीठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे. - डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ