इगतपुरी : भरधाव वेगाने जाणार्या कारने रस्ता ओलांडणार्या सायकलस्वारास धडक दिल्यामुळे सायकलवरील दोघे जागीच ठार झाले. मृत झालेले माय-लेक असून या अपघातात सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपरी गावाजवळ झालेल्या या दुर्घटनेनंतर १० ते १५ हजारांच्या संतप्त जमावाने महामार्ग रात्री उशीरापर्यंत रोखून धरला होता. लहानुबाई चव्हाण यांचा मृतदेह रस्त्यावरच ठेऊन गावकर्यांनी आंदोलन केले. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव येथील नंदू भिवा चव्हाण (४२) नेहमीप्रमाणे आईला व मुलाला सायकलवरून घरी घेऊन जात होते. महामार्गावरील पिंपरी सदो फाटयाजवळ रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलला जोरदार धडक दिली. त्यात लहानुबाई भिवा चव्हाण (५५) व नंदू चव्हाण जागीच ठार झाले तर यश नंदू चव्हाण (६) गंभीर जखमी झाला. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून पिंपरी फाटा आणि बोरटेंभा या ठिकाणी आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. राष्टÑीय महामार्गाचे अधिकारी आणि टोल वसूल करणारी कंपनीचे अधिकारी ठोस आश्वासन देईपर्यंत मृतदेह रस्त्यावरून न उचलण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प झाली. महामार्गावर सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत झाली. (वार्ताहर)
मुंबई-नाशिक महामार्ग अपघातानंतर ठप्प
By admin | Updated: May 31, 2014 05:39 IST