शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

वाहन नोंदणीवर मर्यादा आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

By admin | Updated: February 18, 2016 18:23 IST

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून मुंबईकरांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे

ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई, दि. 18 - मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असून मुंबईकरांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. 
द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रस्तावात 3 पर्याय सुचवण्यात आले आहेत. ज्यामध्ये नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची ठराविक तारखेनंतर नोंदणी केली जाऊ नये; नव्या वाहन नोंदणींवर मर्यादा तसंच पार्कीग करण्यासाठी जागा असल्याचा पुरावा दिला तरच वाहन नोंदणी करुन देणे हे पर्याय सुचवण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल आणि याचा परिणाम वाहतुकीची समस्या मिटेलच सोबत पार्कींगलादेखील जागा मिळेल असं या प्रस्तावात सांगितले गेले आहे.
 या प्रस्तावात काही उपायदेखील सुचवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूकीच्या पायाभूत सुविधा सुधारण्याची गरज असल्याच सांगितल आहे जेणेकरुन लोकांना आणि वाहनांना अडथळा येणार नाही. 34 बस मार्ग बांधण्यात यावेत ज्यावर फक्त बसेसना वाहतुकीची परवानगी असेल, ज्यामुळे त्यांचा वेग आणि फे-या वाढण्यास मदत होईल. यासोबतच मेट्रो नेटवर्क, 19 प्लायओव्हर, 100 सायकलिंग ट्रॅक आणि 6 एलिवेटेड रस्ते बांधण्याचंदेखील सुचवण्यात आले आहे. 
राज्य सरकारचे अधिकारी यावर काही बोलत नसले तरी लवकरच हा प्रस्ताव अंमलात आणला जाण्याची चर्चा आहे. काही अधिका-यांनी खाजगी वाहनांवर सरसकट बंदी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.