शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुंबईचा महापौर काँग्रेसचा हवा - राहूल गांधी

By admin | Updated: January 15, 2016 16:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण खूप चांगलं करतात, परंतु काम काही करत नाहीत अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण खूप चांगलं करतात, परंतु काम काही करत नाहीत अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. मुंबईत काँग्रेसचा महापौर हवा असं सांगत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वत: जातीनं लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सूचित केलं. मालाडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच उद्या मुंबईत वीज स्वस्ताईसाठी काँग्रेस पदयात्रा काढणार असून या पदयात्रेतही राहूल गांधी सहभागी हेणार आहेत.
मोदींनी स्वच्छ भारताचं स्वप्न दाखवलं, प्रत्यक्षात काही केलं नाही असं गांधी म्हणाले. तसेच मोदी सरकारने, शेतक-यांना व कामगारांना कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला. 
 
राहूल गांधींच्या छोटेखानी भाषणातील मुद्दे:
 
- वीजेची महागाई कमी करण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणं आवश्यक आहे.
- मुंबई, महाराष्ट्र व दिल्लीत काँग्रेसचं सरकार आणू त्यासाठी जनतेत मिसळा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या.
- मुंबईचा महापौर काँग्रेसचा हवा त्यासाठी गरज वाटली तर मी पुन्हा पुन्हा पुन्हा मुंबईत येईन.
- घनकचरा व्यवस्थापन हे मुख्य आव्हान आहे, त्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही
- स्वच्छता हवी असेल, वीज स्वस्त हवी असेल तर काँग्रेसला निवडून द्या.
- मुंबई व महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये काँग्रेस रुजलेली आहे, गरज आहे ती लोकांच्या मनात ही भावना जागृत करण्याची.