शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे ! RJ मलिष्काचा मनपाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:34 IST

मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 
 
"मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?", या गाण्यातून पावसाळ्यात होणारी मुंबईची दैनावस्था मांडली होती. यामुळे मलिष्का सध्या मुंबई मनपाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.  याच पार्श्वभूमीवर आर जे मलिष्काने मुंबई मनपाला आणखी एक टोला लगावला आहे. या सर्व घटनाक्रमादरम्यान,  मुंबईकर मलिष्काला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. 
 
यासंदर्भात मलिष्काने ट्विट करुन मुंबईकरांचे, मुंबईचे आभार मानले आहेत. ""मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे"", असे ट्विट मलिष्कानं केले आहे.  
 
आणखी बातम्या वाचा
(RJ मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या, मुंबई मनपानं बजावली नोटीस)
 
तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिका-यांनी मलिष्का राहत असलेल्या इमारतीची मंगळवारी (18 जुलै )तपासणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे. 
 
वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये बुधवारी एच वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या अधिका-यांनी तपासणी केली असता लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या. लिली मेंडोंसा ( ६५ वर्ष) म्हणजे मलिष्काची आई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
 
पालिकेनं बजावली नोटीस
डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी यासाठी पालिका जनजागृती करत असतानाही सुशिक्षितांच्या घरात कशी बेफिकिरी असते याचे उदाहरण मलिष्काने दिले आहे. या प्रकरणी एच वॉर्ड कार्यालयाने लिली यांना नियमानुसार नोटीस बजावली आहे.
 
दरम्यान, यापूर्वी मलिष्काच्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’  गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे. त्यामुळे मलिष्कावर कायदेशीर कारवाई करीत तिच्या विरोधात ५00 कोटी रुपयांचा दावा महानगरपालिकेने दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत विधि खात्याचे मत मागविल्याचे सूत्रांकडून समजते. 
 
‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ हे गीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात रेडिओ जॉकी मलिष्का ‘मुंबईत पाणी तुंबतं, रेल्वे सेवा लेट होते’, ‘मुंबईत खड्डे पडतात आणि पावसात पालिकेची पोलखोल होते’ असे गीताद्वारे सांगते आहे. पहारेकरी आधीच दबा धरून बसले असताना हे गाणे म्हणजे भाजपाच्या हाती आयते कोलीत आल्यासारखे आहे. त्यामुळे मलिष्कावर कारवाईची मागणी करीत प्रतिस्पर्ध्यांचे तोंड बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. 
 
त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांनी आयुक्तांची मंगळवारी ( 18 जुलै ) त्यांच्या दालनात भेट घेतली. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. मुंबईविषयी चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले, याची दखल घेऊन आयुक्तांनी विधि खात्याकडे याविषयी मत मागितले आहे.