शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

मुंबई-गोवा महामार्ग खचला

By admin | Updated: June 9, 2016 02:28 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाड तालुक्यातील दासगांवच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस वसलेल्या नागरिकांच्या रहदारीसाठी महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहे. काही वर्षांपूर्वी दासगांव खिंडीचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाचे रुंदीकरण करून बाजूच्या रस्त्यालाही १० फू ट वाढवण्यात आले. मात्र त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणचे निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे पुलाचा काही भाग पावसाळ्यात खचला होता. त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी लावण्यात आली होती. सध्या वाढलेल्या वाहतुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा याच ठिकाणी जवळपास दीड फूट राष्ट्रीय महामार्ग खचला आहे. खचलेल्या ठिकाणाहून फक्त १० किमी अंतरावर महामार्गाचे कार्यालय असून महामार्ग प्रशासन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. जानेवारी महिन्यापासून या मार्गावर वाहतूक वाढली आहे. दासगांव खिंड ते बसस्टॉप जवळपास २०० मीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्गाचा अर्धा भाग एका बाजूने खचत आहे. मुंबई ते गोवा दिशेने जाणारी वाहने वेगाने आल्यानंतर मुंबई दिशेला समोरून येणारी वाहने पाहिल्यानंतर या खचलेल्या भागामुळे तिरकी होवून चालकाचे नियंत्रण सुटत आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. >पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरणदासगांव हद्दीतील या पुलाचे काही वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते. जवळपास ६ ते ७ फूट पूल तसेच या ठिकाणच्या रस्त्याचे देखील रुंदीकरण के लेहोते. सुरुवातीलाच्या पावसात या पुलाच्या शेजारी रुंदीकरण करण्यात आलेला रस्ता व पूल काही प्रमाणात खचला व या ठिकाणी जुना आणि नवीन पुलाचा जोड बरोबर न झाल्याने दोन्ही पुलाच्या मधल्या भागातून उन्हामुळे डांबर विरघळून गळती झाली होती. यामुळे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना फटका बसून या डांबरामुळे भाजले होते, तर कित्येक नागरिकांचे कपडे खराब झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.>ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तेथे जावून पाहणी करतो. आमच्या लेव्हलचे छोटे काम असेल तर लगेच करून घेतले जाईल. मोठे काम असेल तर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे ताबडतोब पाठवून देण्यात येईल, त्यानंतर आदेशाप्रमाणे काम के ले जाईल.-प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग महाड विभाग.