शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सुरू, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासांत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:10 IST

मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून

अलिबाग : मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून, कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघीपर्यंत आलेली ही बोट गुरुवारी भाऊचा धक्का (मुंबई) - दिघी(रायगड) आणि पुढे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळपर्यंत प्रवासी सेवा देणार असून, परतीचा प्रवासदेखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या ँ३३स्र२://ेंँेंु.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला. गुरुवारपासून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी माहिती दिघी बंदराचे अधीक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.बुधवारी केपीएएस ही बोट सकाळी ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली.बोट फेºयांचे वेळापत्रकगुरु वार १९ आॅक्टोबर रोजी शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल, तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.शुक्र वारी २० आॅक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई