शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सुरू, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासांत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:10 IST

मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून

अलिबाग : मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून, कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघीपर्यंत आलेली ही बोट गुरुवारी भाऊचा धक्का (मुंबई) - दिघी(रायगड) आणि पुढे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळपर्यंत प्रवासी सेवा देणार असून, परतीचा प्रवासदेखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या ँ३३स्र२://ेंँेंु.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला. गुरुवारपासून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी माहिती दिघी बंदराचे अधीक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.बुधवारी केपीएएस ही बोट सकाळी ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली.बोट फेºयांचे वेळापत्रकगुरु वार १९ आॅक्टोबर रोजी शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल, तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.शुक्र वारी २० आॅक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई