शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सुरू, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासांत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:10 IST

मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून

अलिबाग : मंगळवारपासून एसटी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने भाऊचा धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करून, कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. बुधवारी दिघीपर्यंत आलेली ही बोट गुरुवारी भाऊचा धक्का (मुंबई) - दिघी(रायगड) आणि पुढे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळपर्यंत प्रवासी सेवा देणार असून, परतीचा प्रवासदेखील दाभोळ-दिघी-भाऊचा धक्का असा असेल, अशी माहिती मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मेरिटाइम बोर्डाने डेल्टा मेरिटाइम अँड इंडस्ट्रियल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना एमव्ही रावी आणि एमव्ही शिवम या दोन बोटी आणि विंध्यवासिनी मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या एमव्ही केपीएस या बोटीला मुंबई ते दिघी, दिघी ते दाभोळ आणि दाभोळहून दिघीमार्गे मुंबई या मार्गावर चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. या बोटसेवेचे वेळापत्रक बोर्डाच्या ँ३३स्र२://ेंँेंु.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर देण्यात आले आहे. मुंबई ते दिघी या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३३० रु. आणि मुंबई ते दाभोळसाठी प्रति प्रवासी ६६० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्वकल्पना नसल्याने पहिल्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी दोन प्रवाशांनी धक्का (मुंबई) ते दिघी (रायगड) या सागरी प्रवासी सेवेचा लाभ घेतला. गुरुवारपासून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी माहिती दिघी बंदराचे अधीक्षक अरविंद सोनावणे यांनी दिली.बुधवारी केपीएएस ही बोट सकाळी ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दुपारी दीड वाजता दिघीला पोहोचली.बोट फेºयांचे वेळापत्रकगुरु वार १९ आॅक्टोबर रोजी शिवम ही बोट स. ८ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. १२.३० वाजता दिघीला पोहोचेल. रावी ही बोट स. ९ वाजता भाऊचा धक्का येथून निघून दु. दीड वाजता दिघीला पोहोचेल, तर दिघीहून दु. २.३० वाजता निघून सायंकाळी ७ वाजता मुंबईला पोहोचेल. केपीएस ही बोट स. साडेदहा वाजता भाऊचा धक्काहून निघून दु. ३ वाजता दिघीला पोहोचेल, तर दु. ४ वा. दिघीहून निघून रा. ८.३० वा. मुंबईला पोहोचेल.शुक्र वारी २० आॅक्टोबर रोजी एमव्ही रावी बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ८ ते दु. १२.३० व दिघी-मुंबईसाठी दु. १.३० ते सायं. ६, केपीएस बोटीचे मुंबई-दिघीसाठी स. ९.३० ते दु. २ व दिघी-मुंबईसाठी दु. ३ ते सायं. ७.३० असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई